शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आशियाड २०३०, आॅलिम्पिक २०३२ ची दावेदारी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 03:07 IST

मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली. याशिवाय २०२१ मध्ये आयओसी काँग्रेसचे यजमानपद भूषविण्याची इच्छा आयओएने व्यक्त केली आहे.आयओएप्रमुख नरेंद्र बत्रा यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले, त्यात आशियाड आणि आॅलिम्पिकच्या यजमानपदाची दावेदारी करण्यासह नव्या समिती आणि आयोगाची स्थापना करण्यावर चर्चा झाली. भविष्यातील योजनेनुसार निर्णय झाले आहेत. आयओएच्या कार्यकारिणीने गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या कामगिरीचीही समीक्षा केली. अपयशावर तोडगा शोधण्यासाठी नवी समिती आणि आयोग स्थापण्याचा निर्णय झाला.’इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात १८ आॅगस्ट ते २ डिसेंबर या कालावधीत आशियाडचे आयोजन होत आहे. त्याआधी २३७० खेळाडू आणि अधिकाऱ्यांची नोंदणीकरण्यात आली आहे. आशियाडसाठी खेळाडू आणि अधिकाºयांची लांबलचक यादी आयोजकांकडे पाठविण्यात आली असून विविध संघटनांकडून अंतिम निवड झाल्यानंतर भारतीय पथकाचा आकार लहान करण्यात येईल, असे बत्रा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आशियाडसाठी ९०० जणांचे पथक?जकार्ता आशियाडसाठी भारताचे ९०० जणांचे पथक पाठविण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत. आयओएप्रमुख नरेंद्र बत्रा आणि सचिव राजीव मेहता यांनी ६२० हून अधिक खेळाडू, तसेच २७३ अधिकाºयांच्या अंतिम यादीला मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.सध्याच्या अस्थायी यादीत १९३८ खेळाडू, ३९९ अधिकारी, आयओएचे आठ, क्रीडा मंत्रालयाचे सात आणि साईच्या १८ अधिकाºयांची नावे आहेत. यातील नावे गाळून ३० जूनपर्यंत यादीला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर ही यादी ९०० वर आणण्यात येणार असल्याचे मेहता म्हणाले.२०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये भारताने ५४१ खेळाडू पाठविलेहोते. देशाला २८ खेळांमध्ये ५७ पदके मिळाली. आयओएद्वारेनिलंबित असलेल्या तायक्वाँदो, गोल्फ, जिम्नॅस्टिक आणि तिरंदाजीसंघांची निवड अस्थायी समिती करेल. भारतीय गोल्फ महासंघाने ६ जूनपर्यंत घटनादुरुस्ती केल्यास आशियाडसाठी गोल्फ संघ पाठविला जाईल,असे मेहता यांनी सांगितले.आई-वडिलांना अ‍ॅक्रिडेशन नाहीचआशियाडसाठी खेळाडूंच्या आई-वडिलांना अ‍ॅक्रिडेशन (प्रवेशपत्र) न देण्याच्या धोरणाचे कठोर पालन करण्याचा भारतीय आॅलिम्पिक संघटनेने निर्णय घेतला आहे. राष्टÑकुल स्पर्धेसाठी सायना नेहवालने वडील हरवीरसिंग यांना अ‍ॅक्रिडेशन न दिल्यास स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आयओएने नमते घेत तिच्या वडिलांना अ‍ॅक्रिडेशन दिले.सायनाने राष्टÑकुलचे सुवर्ण जिंकले. आशियाडसाठी आम्ही खेळाडूंच्या आई-वडिलांना अ‍ॅक्रिडेशन देणार नाही. राष्टÑीय महासंघ आई-वडील, पती, पत्नी किंवा नातेवाईक यांचे नाव सहयोगी स्टाफमध्ये सहभागी करीत असेल तर आयओए आक्षेप घेणार नाही, असेही राजीव मेहता यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sportsक्रीडा