शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आशियाड २०३०, आॅलिम्पिक २०३२ ची दावेदारी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 03:07 IST

मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : मुंबईत २०२६ मध्ये युवा आॅलिम्पिक आणि २०३० मध्ये आशियाडच्या अयोजनासह २०३२ च्या आॅलिम्पिकचे आयोजन नवी दिल्लीत करण्यास भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) उत्सुक आहे. यासंदर्भात दावेदारी सादर करण्याची शनिवारी घोषणा करण्यात आली. याशिवाय २०२१ मध्ये आयओसी काँग्रेसचे यजमानपद भूषविण्याची इच्छा आयओएने व्यक्त केली आहे.आयओएप्रमुख नरेंद्र बत्रा यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले, त्यात आशियाड आणि आॅलिम्पिकच्या यजमानपदाची दावेदारी करण्यासह नव्या समिती आणि आयोगाची स्थापना करण्यावर चर्चा झाली. भविष्यातील योजनेनुसार निर्णय झाले आहेत. आयओएच्या कार्यकारिणीने गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या कामगिरीचीही समीक्षा केली. अपयशावर तोडगा शोधण्यासाठी नवी समिती आणि आयोग स्थापण्याचा निर्णय झाला.’इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात १८ आॅगस्ट ते २ डिसेंबर या कालावधीत आशियाडचे आयोजन होत आहे. त्याआधी २३७० खेळाडू आणि अधिकाऱ्यांची नोंदणीकरण्यात आली आहे. आशियाडसाठी खेळाडू आणि अधिकाºयांची लांबलचक यादी आयोजकांकडे पाठविण्यात आली असून विविध संघटनांकडून अंतिम निवड झाल्यानंतर भारतीय पथकाचा आकार लहान करण्यात येईल, असे बत्रा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आशियाडसाठी ९०० जणांचे पथक?जकार्ता आशियाडसाठी भारताचे ९०० जणांचे पथक पाठविण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत. आयओएप्रमुख नरेंद्र बत्रा आणि सचिव राजीव मेहता यांनी ६२० हून अधिक खेळाडू, तसेच २७३ अधिकाºयांच्या अंतिम यादीला मंजुरी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.सध्याच्या अस्थायी यादीत १९३८ खेळाडू, ३९९ अधिकारी, आयओएचे आठ, क्रीडा मंत्रालयाचे सात आणि साईच्या १८ अधिकाºयांची नावे आहेत. यातील नावे गाळून ३० जूनपर्यंत यादीला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. मंत्रालयाशी सल्लामसलत केल्यानंतर ही यादी ९०० वर आणण्यात येणार असल्याचे मेहता म्हणाले.२०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये भारताने ५४१ खेळाडू पाठविलेहोते. देशाला २८ खेळांमध्ये ५७ पदके मिळाली. आयओएद्वारेनिलंबित असलेल्या तायक्वाँदो, गोल्फ, जिम्नॅस्टिक आणि तिरंदाजीसंघांची निवड अस्थायी समिती करेल. भारतीय गोल्फ महासंघाने ६ जूनपर्यंत घटनादुरुस्ती केल्यास आशियाडसाठी गोल्फ संघ पाठविला जाईल,असे मेहता यांनी सांगितले.आई-वडिलांना अ‍ॅक्रिडेशन नाहीचआशियाडसाठी खेळाडूंच्या आई-वडिलांना अ‍ॅक्रिडेशन (प्रवेशपत्र) न देण्याच्या धोरणाचे कठोर पालन करण्याचा भारतीय आॅलिम्पिक संघटनेने निर्णय घेतला आहे. राष्टÑकुल स्पर्धेसाठी सायना नेहवालने वडील हरवीरसिंग यांना अ‍ॅक्रिडेशन न दिल्यास स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. आयओएने नमते घेत तिच्या वडिलांना अ‍ॅक्रिडेशन दिले.सायनाने राष्टÑकुलचे सुवर्ण जिंकले. आशियाडसाठी आम्ही खेळाडूंच्या आई-वडिलांना अ‍ॅक्रिडेशन देणार नाही. राष्टÑीय महासंघ आई-वडील, पती, पत्नी किंवा नातेवाईक यांचे नाव सहयोगी स्टाफमध्ये सहभागी करीत असेल तर आयओए आक्षेप घेणार नाही, असेही राजीव मेहता यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sportsक्रीडा