शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अश्विनमुळे आमच्यापुढे नवा पर्याय - संजय बांगर

By admin | Updated: August 10, 2016 20:49 IST

अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या

ऑनलाइन लोकमत

ग्रास आइलेट, दि.10 -  अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या सतत्यामुळे फलंदाजी व्यवस्थापनाकडे नवा पर्याय उलबध्द झाला आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अश्विनचे कौतुक केले. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवताना अश्विनने प्रतिकूल परिस्थितीतून टीम इंडियाला सावरण्यात मोलाचे योगदान दिले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर अश्विनने पहिल्या दिवसअखेर नाबाद ७५ धावांची मजबूत खेळी केली. भारताचा अर्धा संघ १२६ धावांत गारद झाल्यानंतर अश्विनने यष्टीरक्षक वृध्दिमान साहसह उपयुक्त नाबाद शतकी भागीदारी करुन संघाला सावरले.बांगर यांनी सांगितले की, ‘‘सहाव्या क्रमांकावर अश्विनची ही तिसरी खेळी आहे. या मालिकेआधी त्याने कधीही या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. त्याच्यामध्ये फलंदाजी करण्याची पुरेपुर क्षमता असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याला अशी अप्रतिम खेळी सहाव्या क्रमांकावर करताना पाहिले नव्हते. त्याचबरोबर एक सलामी फलंदाज म्हणूनही त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याची माहिती आम्हाला आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘अश्विनच्या या शानदार खेळीमुळे आमच्यापुढे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे खालच्या फळीतील फलंदाज ज्याप्रकारे योगदान देत आहेत, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचा आत्मविश्वास वाढत आहे,’’ असेही बांगर यांनी सांगितले. शिवाय बांगर यांनी यावेळी अश्विनला चांगली साथ देणाºया झुंजार वृद्धिमान साहाच्या खेळीचेही कौतुक केले. (वृत्तसंस्था)