शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अश्विनमुळे आमच्यापुढे नवा पर्याय - संजय बांगर

By admin | Updated: August 10, 2016 20:49 IST

अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या

ऑनलाइन लोकमत

ग्रास आइलेट, दि.10 -  अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाला सुरवातीच्या धक्क्यानंतर सावरण्यात यश आले. तसेच त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना केलेल्या सतत्यामुळे फलंदाजी व्यवस्थापनाकडे नवा पर्याय उलबध्द झाला आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी अश्विनचे कौतुक केले. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवताना अश्विनने प्रतिकूल परिस्थितीतून टीम इंडियाला सावरण्यात मोलाचे योगदान दिले. आघाडीची फळी कोसळल्यानंतर अश्विनने पहिल्या दिवसअखेर नाबाद ७५ धावांची मजबूत खेळी केली. भारताचा अर्धा संघ १२६ धावांत गारद झाल्यानंतर अश्विनने यष्टीरक्षक वृध्दिमान साहसह उपयुक्त नाबाद शतकी भागीदारी करुन संघाला सावरले.बांगर यांनी सांगितले की, ‘‘सहाव्या क्रमांकावर अश्विनची ही तिसरी खेळी आहे. या मालिकेआधी त्याने कधीही या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. त्याच्यामध्ये फलंदाजी करण्याची पुरेपुर क्षमता असल्याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, त्याला अशी अप्रतिम खेळी सहाव्या क्रमांकावर करताना पाहिले नव्हते. त्याचबरोबर एक सलामी फलंदाज म्हणूनही त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्याची माहिती आम्हाला आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘अश्विनच्या या शानदार खेळीमुळे आमच्यापुढे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे खालच्या फळीतील फलंदाज ज्याप्रकारे योगदान देत आहेत, त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाचा आत्मविश्वास वाढत आहे,’’ असेही बांगर यांनी सांगितले. शिवाय बांगर यांनी यावेळी अश्विनला चांगली साथ देणाºया झुंजार वृद्धिमान साहाच्या खेळीचेही कौतुक केले. (वृत्तसंस्था)