शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

आश्विनने मोडला लिलीचा विक्रम

By admin | Updated: February 13, 2017 00:10 IST

भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम

हैदराबाद : भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम नोंदवला. आश्विनने ४५ कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना आॅस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिलीचा विक्रम मोडला. लिलीने ४८ कसोटी सामन्यांत हा पराक्रम केला होता. आश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात २ बळी घेत या विक्रमाला गवसणी घातली.अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), झहीर खान (३११) आणि बिशनसिंग बेदी (२६६) यांच्यानंतर २५० कसोटी बळी घेणारा आश्विन सहावा भारतीय गोलंदाज ठरला. आश्विनने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ५९ बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावाच्या अखेरपर्यंत त्याने २४ वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले असून सामन्यांत सात वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्याने चार शतके झळकावताना १८१६ धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)विक्रम नोंदवला, चांगले झाले : आश्विनविक्रम नोंदवला, चांगले झाले, अशी प्रतिक्रिया रविवारी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद २५० बळींचा टप्पा गाठण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी त्याने हा पराक्रम केला. आज मी सुरुवातीपासून गोलंदाजीचा आनंद घेतला. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना अधिक मदत मिळत नाही. आम्हाला सोमवारी सकाळच्या सत्रात संयम बाळगावा लागेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना विशेष आनंद मिळाला. मला पहिल्या डावात विशेष चांगली कामगिरी करता आली नाही, पण दुसऱ्या डावात सूर गवसला.