शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

आश्विनने मोडला लिलीचा विक्रम

By admin | Updated: February 13, 2017 00:10 IST

भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम

हैदराबाद : भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विनने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी सर्वांत कमी कसोटी सामन्यांत २५० बळी घेण्याचा विक्रम नोंदवला. आश्विनने ४५ कसोटी सामन्यांत हा पराक्रम करताना आॅस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिलीचा विक्रम मोडला. लिलीने ४८ कसोटी सामन्यांत हा पराक्रम केला होता. आश्विनने बांगलादेशच्या पहिल्या डावात २ बळी घेत या विक्रमाला गवसणी घातली.अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), झहीर खान (३११) आणि बिशनसिंग बेदी (२६६) यांच्यानंतर २५० कसोटी बळी घेणारा आश्विन सहावा भारतीय गोलंदाज ठरला. आश्विनने यंदाच्या मोसमात आतापर्यंत ५९ बळी घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावाच्या अखेरपर्यंत त्याने २४ वेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले असून सामन्यांत सात वेळा १० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्याने चार शतके झळकावताना १८१६ धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)विक्रम नोंदवला, चांगले झाले : आश्विनविक्रम नोंदवला, चांगले झाले, अशी प्रतिक्रिया रविवारी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद २५० बळींचा टप्पा गाठण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या रविचंद्रन अश्विनने व्यक्त केली. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी त्याने हा पराक्रम केला. आज मी सुरुवातीपासून गोलंदाजीचा आनंद घेतला. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना अधिक मदत मिळत नाही. आम्हाला सोमवारी सकाळच्या सत्रात संयम बाळगावा लागेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना विशेष आनंद मिळाला. मला पहिल्या डावात विशेष चांगली कामगिरी करता आली नाही, पण दुसऱ्या डावात सूर गवसला.