शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अरुण यांच्यामुळे चुका सुधारण्यास मदत झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:22 IST

माझ्या वेगवान माऱ्यात काही उणिवा होत्या. गोलंदाज कोच भरत अरुण यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात या उणिवा दूर करण्यास मदत केली, असे मत वेगवान

नवी दिल्ली : माझ्या वेगवान माऱ्यात काही उणिवा होत्या. गोलंदाज कोच भरत अरुण यांनी स्वत:च्या पहिल्या कार्यकाळात या उणिवा दूर करण्यास मदत केली, असे मत वेगवान गोलंदाज उमेश यादव याने व्यक्त केले.मुख्य कोच रवी शास्त्री यांच्या पसंतीनुसार अरुण यांना टीम इंडियासोबत गोलंदाजी कोच म्हणून दुसरा कार्यकाल बहाल करण्यात आला आहे. ते पुढील दोन वर्षे संघासोबत असतील. या पार्श्वभूमीवर स्थानिक कसोटी सत्रात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या उमेशने यशाचे श्रेय अरुण यांच्या परिश्रमांना दिले. एका मुलाखतीत उमेश म्हणाला, ‘मागचे सत्र कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यासाठी ‘लकी’ ठरले. मी सातत्यपूर्ण मारा केला. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मला अरुण यांनी प्रोत्साहन देत चुका सुधारण्यास मदत केली. या यशाचे श्रेय त्यांनादेखील जाते.’उमेशने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १७ गडी बाद केले. चार कसोटी सामन्यांत कुठल्याही वेगवान भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी उमेश मानसिक तयारी करीत आहे. सरावात उमेश ‘एसजी’ऐवजी ‘कुकाबुरा’ चेंडूने गोलंदाजी करीत आहे. पाटा खेळपट्ट्यांवर कुकाबुरा चेंडू आव्हानात्मक असतो, असे सांगून उमेश म्हणाला, ‘कुकाबुरा चेंडू २५ षटकांनंतर चांगलाच जुना होतो. लाल कुकाबुरा चेंडूने पहिल्या १५ षटकांत बळी घेता येतात. तथापि चेंडूचे सीम थोडे घासले गेल्यास पाटा खेळपट्टीवर हा चेंडू अधिक आव्हानात्मक बनतो.’ (वृत्तसंस्था)मी संघात असताना कधी आत, तर कधी बाहेर बसत होतो. या काळात गोलंदाजीतील उणिवा शोधल्या आणि त्या दूर केल्यामुळे चांगले निकाल पाहायला मिळाले. अंतिम एकादशमध्ये नसायचो त्या वेळी अरुण नेट्समध्ये माझ्यासोबत तासन्तास वेळ घालवित होते.नागपुरात वास्तव्यास असायचो तेव्हा हेच काम माजी वेगवान गोलंदाज सुब्रतो बॅनर्जी करीत असत. दोघांनीही माझे तंत्र सुधारण्यावर परिश्रम घेतल्याने मी दोघांचाही सदैव ऋणी असल्याचे उमेशने सांगितले.