शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

अनुराग ठाकूर यांचा सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा

By admin | Updated: July 13, 2017 20:26 IST

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.

ऑनलाइन लोमकत
नवी दिल्ली, दि. 13 - न्यायालयात शपथ घेऊन खोटी माहिती देणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. अनुराग ठाकूर यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करण्यात आला असून, न्यायालय उद्या त्यावर निर्णय घेणार आहे. 
अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात स्पष्ट शब्दात बिनशर्त माफीनामा सादर करवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सात जुलै रोजी दिले होते. त्यानंतर आज ठाकूर यांच्याकडून माफीनामा सादर करण्यात आला. चुकीची माहिती आणि गैरसमजातून सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिली गेली. त्यासाठी मी कोणत्याही अटीविना माफी मागतो. मी न्यायालयाच्या  प्रतिष्ठेला कधीच कमी समजलेले नाही, असे अनुराग ठाकूर यांनी  सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका पानाच्या माफीनाम्यामध्ये  म्हटले आहे.   
या प्रकरणी 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले होते. अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात शपथपत्र सादर करावे, ज्यात स्पष्ट शब्दात माफीनामा असेल. तसेच त्यांच्याकडून सादर करण्यात आलेले शपथपत्र न्यायालय स्वीकारणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते  न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला होता.  अधिक वाचा 
( बीसीसीआय संकटात : अनुराग ठाकूर )
(भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रश्नच येत नाही - अनुराग ठाकूर )
( ठाकूर तो गयो ! अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट )
 
 
माफीनामा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई बंद करण्यात येईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर अनुराग ठाकूर यांचे वकील पी.एस. पटवालिया यांनी आपले अशिल बिनशर्त माफी मागण्यास तयार आहेत असे सांगितले. तसेच या खटल्यात आपली बाजू भक्कम होती. तसेच आमच्या अशिलाने काही चूक केली नसल्याचे आपण सिद्ध करू शकलो असतो, असेही ते म्हणाले.  
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अनुराग ठाकूर यांनी नोंदवलेला जबाब खोटा असल्याचे मत न्यायलयाने नोंदवले होते. तसेच त्यासाठी ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभारात बदल सुचवण्यासाठी लोढा समितीची नियुक्ती केली होती.