शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग ठाकूर यांचा सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा

By admin | Updated: July 13, 2017 20:26 IST

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.

ऑनलाइन लोमकत
नवी दिल्ली, दि. 13 - न्यायालयात शपथ घेऊन खोटी माहिती देणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी आज सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. अनुराग ठाकूर यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर करण्यात आला असून, न्यायालय उद्या त्यावर निर्णय घेणार आहे. 
अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात स्पष्ट शब्दात बिनशर्त माफीनामा सादर करवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सात जुलै रोजी दिले होते. त्यानंतर आज ठाकूर यांच्याकडून माफीनामा सादर करण्यात आला. चुकीची माहिती आणि गैरसमजातून सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिली गेली. त्यासाठी मी कोणत्याही अटीविना माफी मागतो. मी न्यायालयाच्या  प्रतिष्ठेला कधीच कमी समजलेले नाही, असे अनुराग ठाकूर यांनी  सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या एका पानाच्या माफीनाम्यामध्ये  म्हटले आहे.   
या प्रकरणी 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले होते. अनुराग ठाकूर यांनी न्यायालयात शपथपत्र सादर करावे, ज्यात स्पष्ट शब्दात माफीनामा असेल. तसेच त्यांच्याकडून सादर करण्यात आलेले शपथपत्र न्यायालय स्वीकारणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते  न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचुड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला होता.  अधिक वाचा 
( बीसीसीआय संकटात : अनुराग ठाकूर )
(भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रश्नच येत नाही - अनुराग ठाकूर )
( ठाकूर तो गयो ! अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट )
 
 
माफीनामा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई बंद करण्यात येईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर अनुराग ठाकूर यांचे वकील पी.एस. पटवालिया यांनी आपले अशिल बिनशर्त माफी मागण्यास तयार आहेत असे सांगितले. तसेच या खटल्यात आपली बाजू भक्कम होती. तसेच आमच्या अशिलाने काही चूक केली नसल्याचे आपण सिद्ध करू शकलो असतो, असेही ते म्हणाले.  
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अनुराग ठाकूर यांनी नोंदवलेला जबाब खोटा असल्याचे मत न्यायलयाने नोंदवले होते. तसेच त्यासाठी ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभारात बदल सुचवण्यासाठी लोढा समितीची नियुक्ती केली होती.