शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व

By admin | Updated: September 22, 2016 05:42 IST

अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. बुधवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या ८७व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणूनही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावरून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. यामध्ये सर्वांत आघाडीवर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे नाव होते. आयसीसीमध्ये बीसीसीयाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र मुंबईत झालेल्या सभेमध्ये ही जबाबदारी ठाकूर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय झाला.त्याचवेळी आयसीसीचे चेअरमन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या उपस्थितीमध्ये ठाकूर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मोठे वादविवाद होत आहेत. त्याचवेळी आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचीही या वेळी निवड करण्यात आली. (क्रीडा प्रतिनिधी)>शिर्के यांची बिनविरोध निवड...बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांची पुन्हा एकदा बोर्डाच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवड झाली. विशेष म्हणजे, या पदासाठी शिर्के यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने अर्ज केला नसल्याने शिर्के यांच्या नावाची औपचारिक घोषणा मुंबईत झाली. शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, तत्कालीन सचिव अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले, तर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिर्के यांची सचिवपदी वर्णी लागली होती. देवांग गांधी पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांनी चार कसोटी व तीन एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.जतीन परांजपे यांची पश्चिम विभागातून निवड झाली असून, त्यांनी भारताकडून चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.माजी आॅफस्पिनर सरनदीप सिंग उत्तर विभागाचे प्रतिनिधी आहेत.नवनिर्वाचित निवड समितीकडे एकूण १३ कसोटी व ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांना ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.>आयसीसीकडून शुभेच्छा...न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी होणारा पहिला कसोटी सामना भारताचा ५०० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. यानिमित्ताने आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेटचे अभिनंदन केले. मनोहर यांनी सांगितले, ‘५०० कसोटी सामने भारतीय क्रिकेटसाठी मोठे यश आहे. भारत आयसीसीचा अत्यंत महत्त्वपूर्ण सदस्य असून, त्याचा इतिहास शानदार आहे. भारताने जागतिक दर्जाचे खेळाडू तयार केले. या ऐतिहासिक क्षणासाठी मी बीसीसीआयचे अभिनंदन करतो. तसेच, या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी दिलेल्या निमंत्रणासाठी मी बीसीसीआयचे आभार मानतो.’