शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
5
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
6
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
7
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
8
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
9
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
10
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
11
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
12
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
13
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
14
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
15
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
16
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
17
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
18
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
19
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
20
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!

अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व

By admin | Updated: September 22, 2016 05:42 IST

अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. बुधवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या ८७व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणूनही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावरून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. यामध्ये सर्वांत आघाडीवर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे नाव होते. आयसीसीमध्ये बीसीसीयाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र मुंबईत झालेल्या सभेमध्ये ही जबाबदारी ठाकूर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय झाला.त्याचवेळी आयसीसीचे चेअरमन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या उपस्थितीमध्ये ठाकूर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मोठे वादविवाद होत आहेत. त्याचवेळी आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचीही या वेळी निवड करण्यात आली. (क्रीडा प्रतिनिधी)>शिर्के यांची बिनविरोध निवड...बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांची पुन्हा एकदा बोर्डाच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवड झाली. विशेष म्हणजे, या पदासाठी शिर्के यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने अर्ज केला नसल्याने शिर्के यांच्या नावाची औपचारिक घोषणा मुंबईत झाली. शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, तत्कालीन सचिव अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले, तर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिर्के यांची सचिवपदी वर्णी लागली होती. देवांग गांधी पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांनी चार कसोटी व तीन एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.जतीन परांजपे यांची पश्चिम विभागातून निवड झाली असून, त्यांनी भारताकडून चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.माजी आॅफस्पिनर सरनदीप सिंग उत्तर विभागाचे प्रतिनिधी आहेत.नवनिर्वाचित निवड समितीकडे एकूण १३ कसोटी व ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांना ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.>आयसीसीकडून शुभेच्छा...न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी होणारा पहिला कसोटी सामना भारताचा ५०० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. यानिमित्ताने आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेटचे अभिनंदन केले. मनोहर यांनी सांगितले, ‘५०० कसोटी सामने भारतीय क्रिकेटसाठी मोठे यश आहे. भारत आयसीसीचा अत्यंत महत्त्वपूर्ण सदस्य असून, त्याचा इतिहास शानदार आहे. भारताने जागतिक दर्जाचे खेळाडू तयार केले. या ऐतिहासिक क्षणासाठी मी बीसीसीआयचे अभिनंदन करतो. तसेच, या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी दिलेल्या निमंत्रणासाठी मी बीसीसीआयचे आभार मानतो.’