शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 04:06 IST

भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.

चांगवोन : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. विश्वकपमध्ये अनेक पदके पटकावणाऱ्या या २६ वर्षीय नेमबाजाने १५० पैकी १४० नेम अचूक लगावले. त्यानंतर सुवर्णपदकासाठी शूटआॅफमध्ये त्याची लढत चीनच्या यियांग यांग व स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेजेजसोबत झाली. शूटआॅफमध्ये मित्तलने चीनच्या नेमबाजाचा ४-३ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. आंद्रेजेजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंकुरने त्यासोबत सांघिक स्पर्धेत मोहम्मद असाब व शार्दुल विहानच्या साथीने कांस्यपदक पटकावले. तिन्ही नेमबाजांनी एकूण ४०९ चा स्कोअर नोंदवला. सुवर्णपदकविजेत्या इटली संघाच्या तुलनेत हा स्कोअर दोनने कमी होता. चीनने ४१० च्या स्कोअरसह रौप्यपदक पटकावले.दिवसातील अन्य स्पर्धांमध्ये दोन भारतीय महिला नेमबाज थोड्या फरकाने आपापल्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्या.१० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदकासह २०२० आॅलिम्पिक कोटा निश्चित करणारी अंजुम मुदगिल महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीत ११७० च्या स्कोअरसह नवव्या स्थानी राहिली. अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अंजुम आणि आठव्या स्थानावरील स्वित्झर्लंडची नीना क्रिस्टेन यांचा स्कोअर समान होता, पण नीनाने इनर १० चे ६६ नेम लगावले होते, तर अंजुमने ५६ ने इनर १० चे लगावले होते. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकर ५८४ अंकांसह पात्रता फेरीत १० व्या स्थानी राहिली. रॅपिड फायरच्या दुसºया पात्रता फेरीनंतर चार नेमबाज याच स्कोअरसह बरोबरीत होते, त्यात मनू व्यतिरिक्त सिंगापूरची शीऊ होंग तेह, कतारची अल्दाना साद अलमुबारक, आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियन (१० मीटर पिस्तुल) अन्ना कोराक्की यांचा समावेश होता. शिऊ व अलमुबारक यांनी अनुक्रमे २२ व २१ इनर १० चा स्कोअर नोंदवित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली तर अन्ना व अंजुम यांचे अनुक्रमे १९ व १६ इनर १० होते.ज्युनिअर मिश्र दुहेरी ट्रॅपमध्ये मनीषा किर आणि मानवादित्य सिंग राठोड यांनी पात्रता फेरीत १३९ च्या स्कोअरसह दुसरे स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. फायनलमध्ये २४ अंकांसह त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इटलीच्या ईरिका सेस्सा व लोरेंजो फरारी यांनी विक्रमी ४२ अंकांसह सुवर्णपदकाचा मान मिळवला.स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण २० पदकांची नोंद आहे. भारत तालिकेत कोरिया व चीननंतर तिसºया स्थानी आहे. चीन दुसºया स्थानावर आहे.भारताने विश्वचॅम्पियनशिपच्या माध्यमातून आॅलिम्पिकसाठी दोन कोटा स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)