शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 04:06 IST

भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.

चांगवोन : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. विश्वकपमध्ये अनेक पदके पटकावणाऱ्या या २६ वर्षीय नेमबाजाने १५० पैकी १४० नेम अचूक लगावले. त्यानंतर सुवर्णपदकासाठी शूटआॅफमध्ये त्याची लढत चीनच्या यियांग यांग व स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेजेजसोबत झाली. शूटआॅफमध्ये मित्तलने चीनच्या नेमबाजाचा ४-३ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. आंद्रेजेजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंकुरने त्यासोबत सांघिक स्पर्धेत मोहम्मद असाब व शार्दुल विहानच्या साथीने कांस्यपदक पटकावले. तिन्ही नेमबाजांनी एकूण ४०९ चा स्कोअर नोंदवला. सुवर्णपदकविजेत्या इटली संघाच्या तुलनेत हा स्कोअर दोनने कमी होता. चीनने ४१० च्या स्कोअरसह रौप्यपदक पटकावले.दिवसातील अन्य स्पर्धांमध्ये दोन भारतीय महिला नेमबाज थोड्या फरकाने आपापल्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्या.१० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदकासह २०२० आॅलिम्पिक कोटा निश्चित करणारी अंजुम मुदगिल महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीत ११७० च्या स्कोअरसह नवव्या स्थानी राहिली. अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अंजुम आणि आठव्या स्थानावरील स्वित्झर्लंडची नीना क्रिस्टेन यांचा स्कोअर समान होता, पण नीनाने इनर १० चे ६६ नेम लगावले होते, तर अंजुमने ५६ ने इनर १० चे लगावले होते. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकर ५८४ अंकांसह पात्रता फेरीत १० व्या स्थानी राहिली. रॅपिड फायरच्या दुसºया पात्रता फेरीनंतर चार नेमबाज याच स्कोअरसह बरोबरीत होते, त्यात मनू व्यतिरिक्त सिंगापूरची शीऊ होंग तेह, कतारची अल्दाना साद अलमुबारक, आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियन (१० मीटर पिस्तुल) अन्ना कोराक्की यांचा समावेश होता. शिऊ व अलमुबारक यांनी अनुक्रमे २२ व २१ इनर १० चा स्कोअर नोंदवित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली तर अन्ना व अंजुम यांचे अनुक्रमे १९ व १६ इनर १० होते.ज्युनिअर मिश्र दुहेरी ट्रॅपमध्ये मनीषा किर आणि मानवादित्य सिंग राठोड यांनी पात्रता फेरीत १३९ च्या स्कोअरसह दुसरे स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. फायनलमध्ये २४ अंकांसह त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इटलीच्या ईरिका सेस्सा व लोरेंजो फरारी यांनी विक्रमी ४२ अंकांसह सुवर्णपदकाचा मान मिळवला.स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण २० पदकांची नोंद आहे. भारत तालिकेत कोरिया व चीननंतर तिसºया स्थानी आहे. चीन दुसºया स्थानावर आहे.भारताने विश्वचॅम्पियनशिपच्या माध्यमातून आॅलिम्पिकसाठी दोन कोटा स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)