शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अनिल कुंबळे करणार कोच पदासाठी नव्याने अर्ज

By admin | Updated: June 7, 2017 00:41 IST

भारतीय संघाचे सर्वांत अनुभवी आणि यशस्वी कोच ठरलेले अनिल कुंबळे या पदाच्या शर्यतीत कायम आहेत.

लंडन : भारतीय संघाचे सर्वांत अनुभवी आणि यशस्वी कोच ठरलेले अनिल कुंबळे या पदाच्या शर्यतीत कायम आहेत. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपण्यापूर्वी नव्याने निवड पॅनेलपुढे अर्ज पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या ‘बायोडाटा’सह ते भारतीय संघाच्या भविष्याचा ‘रोडमॅप’ देखील सादर करणार आहेत. बीसीसीआयने कुंबळे यांना कोचपदासाठी नव्याने अर्ज करण्याची गरज असून ते थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतील, असे म्हटले होते. तथापि, कुंबळे यांनी या पदासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला. कोचपदासाठी ज्यांचे अर्ज आले आहेत त्यात वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत, डोडा गणेश यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुलाखती तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीमार्फत होतील. समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे.आॅसट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज क्रेग मॅकडरमॉट यांनी देखील कोच पदासाठी अर्ज पाठविला पण त्यांचा अर्ज ३१ मे या डेडलाईनंतर आला आहे. सल्लागार समिती अर्जावर विचार केल्यानंतर मॅकडरमॉट यांना मुलाखतीसाठी बोलवायचे की नाही याबद्दल निर्णय घेईल. तीन सदस्यांची समिती पुढील मंगळवारी किंवा बुधवारी मुलाखत प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. १८ जून रोजी चॅम्पियन्स ट्रॉफी संपणार असून भारतीय संघाला वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना व्हायचे असल्याने कोचपदाचा उमेदवार आधी निश्चित व्हावा, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. आयपीएल फायनलच्यावेळी बीसीसीआय तसेच सीओएने देखील कुंबळे यांना नव्याने अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोहली आणि कोच कुंबळे यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त मीडियात गाजले.मागच्यावर्षी कुंबळे कोचसाठी पात्रता पूर्ण करीत नसताना देखील त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांचाच वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने मिळविलेले यश सर्वांपुढे आहे. नुकताच कोहली- कुंबळे वाद पुढे आला तेव्हा सचिन आणि गांगुली यांनी कोहलीशी चर्चा केली पण कुंबळे यांना मुलाखतीपर्यंत काहीच विचारणा करायची नाही, असे सल्लागार समितीने ठरविले असल्याचे कळते. जो कुणी नवा कोच बनेल त्या व्यक्तीकडे २०१९ च्या विश्वचषकापर्यंत दोन वर्षे पदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.कुंबळे यांचा वर्षभराचा करार चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपताच संपुष्टात येईल. त्यांच्यासोबत समन्वय साधण्यात त्रास होत असल्याची कोहलीसमवेत काही खेळाडूंची तक्रार होती. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता नव्याने अर्ज मागविण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. कुंबळे यांनी मात्र २५ मे रोजी स्वत:चा अर्ज बीसीसीआय पॅनेलकडे पाठवून दिला.