शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

आमलाच्या शतकावर गुजरात पडले भारी

By admin | Updated: May 8, 2017 11:23 IST

मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमच्या सपाट आणि फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन

आकाश नेवे/आॅनलाइन लोकमतमोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमच्या सपाट आणि फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, आमलाच्या शतकावर गुजरातची सांघिक कामगिरी भारी पडली. आमलाने ६० चेंडूत १०४ धावा केल्या, तर पंजाबच्या उर्वरित फलंदाजांनी ६० चेंडूत फक्त ८२ धावा केल्या. त्याच तुलनेत ड्वेन स्मिथने ३४ चेंडूत ७४ धावा केल्या.मात्र रैना, कार्तिक आणि इशान किशनच्या पूरक खेळीने गुजरातने विजय साकारला. प्ले आॅफच्या बाहेर असलेल्या गुजरात लायन्सने प्ले आॅफसाठी झगडणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मार्गातील अडचणी वाढवून ठेवल्या. आमलाचे शतक तसे पंजाबसाठी या सत्रात दोन्ही वेळा विजय मिळवून देऊ शकले नाही, त्याने दोन्ही वेळा १०४ धावाच केल्या. २० एप्रिलला आमलाने मुंबई इंडियन्स विरोधात ६० चेंडूतच १०४ धावा केल्या होत्या. गुजरातच्या ड्वेन स्मिथ आणि इशान किशन यांनी ९१ धावांची भागिदारी केली. दोनदा मिळालेल्या जीवदानाचा स्मिथने पुरेपूर फायदा घेतला. पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी तीन सोपे झेल सोडले, त्यात एकदा रैनाला जीवदान मिळाले होते.

पंजाबला विजयासाठी काही धावाच कमी पडल्या. अखेरच्या षटकांत कार्तिकने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. आमला वगळता पंजाबच्या फलंदाजांनी कमी धावा काढल्या, हे संघाला मात्र महाग पडले. या खेळपट्टीवर दोनशेधावांचे लक्ष्य गाठणे आवश्यक होते. मार्शने ४३ चेंडूत ५५ धावा केल्या, हीच बाब बहुदा संघाला विजयापासून दूर घेऊन गेली. मार्शचा स्ट्राईक रेट १३४ होता. या उलट गुजरातच्या फलंदाजांनी बाद होण्याची पर्वा न करता मुक्तपणे फलंदाजी केली, त्याचा फायदा त्यांना झाला. इशान किशन वगळता सर्वच फलंदाजांनी १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या, हीच बाबगुजरातच्या पथ्यावर पडली. पंजाबच्या गोलंदाजीचा विचार करता मोहित शर्मा, वरुण अ‍ॅरॉन, टी. नटराजन पुन्हा महाग पडले. वरुणने तर ४ षटकांत ४३ धावा दिल्या. नटराजननेही २.४ षटकांत ३२ धावा दिल्या. संदीप शर्मा फायदेशीर ठरला असला, तरी त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने धोकादायक ठरत असलेल्या रैना आणि फिंचला बाद केले.या पराभवाने पंजाबपुढील अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी सनरायजर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना आहे. अव्वल स्थानावर असलेल्या मुंबईला हैदराबादने पराभूत केले तर पंजाबला प्ले आॅफ गाठणे अशक्य होईल. पंजाबचे ११ सामन्यांत १० गुण आहेत, तर हैदराबादचे १२ सामन्यांत १३ गुण आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना प्ले आॅफ गाठण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे.