शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

नेहमी जबाबदारीचे भान ठेवतो : कोहली

By admin | Updated: August 2, 2015 01:30 IST

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये दिसत नाही. पण, नेहमी जबाबदारीचे भान ठेवून संघासाठी खेळत असल्याने अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण

चेन्नई : गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये दिसत नाही. पण, नेहमी जबाबदारीचे भान ठेवून संघासाठी खेळत असल्याने अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण कसोटी कर्णधार असलेल्या कोहलीने दिले आहे. आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध शनिवारी संपलेल्या चार दिवसांच्या अनधिकृत सामन्यात विराटने १६ आणि ४५ धावांचे योगदान दिले. यजमान संघाला या सामन्यात १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला. भारताने यंदा खूप कसोटी सामने खेळले नाहीत. वन-डेतही कोहलीच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले. त्याने वन-डेत फेब्रुवारीपासून एकही शतक ठोकलेले नाही. १२ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या लंका दौऱ्यात सूर गवसावा यासाठी आक्रमकतेवर संयम राखावा लागेल का, असा सवाल करताच कोहलीने स्पष्टपणे नकार दिला. तो म्हणाला, ‘‘फलंदाज म्हणून नेहमी जबाबदारीने खेळतो. खेळताना संघाचा विजय कसा होईल, याचा विचार मनात असतो. धावा काढण्यासाठी आक्रमकतेत बदल करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. क्रिकेट खेळताना फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, माझे काम १०० टक्के योगदान देणे हेच आहे. संपूर्ण जबाबदारीचे भान ठेवून खेळत असल्याने कुठलाही बदल न करता यापुढेही आक्रमक खेळत राहीन.’’ लंका दौऱ्यात भारताला तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. यावर कोहली म्हणाला, ‘‘प्रथमच संपूर्ण दौऱ्यात भारताचे नेतृत्व करण्यास मी उत्साही आहे.’’ भारत ‘अ’ संघात कोहली राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळला. याचा फार लाभ झाल्याचे कोहलीने सांगितले. राहुल द्रविडसारख्या महान खेळाडूच्या मार्गदर्शनात खेळण्याचा शांतप्रिय अनुभव मी घेतला आहे. राहुलला पाहिल्यानंतरच तुम्हाला बरेच काही शिकायला मिळते, असे कोहलीचे मत होते. या सामन्यात खेळण्याच्या निर्णयासंदर्भात तो म्हणाला, ‘‘लंका दौऱ्याआधी सूर गवसावा, अशी यामागे भावना होती. त्याआधी तीन आठवडे बऱ्यापैकी विश्रांतीदेखील मिळाली आहे. आता लंका दौऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट तयारी करू.’’ संघातील सहकाऱ्यांबाबत तो म्हणाला, ‘‘मुरली विजय, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग आणि रविचंद्रन अश्विन हे सामना फिरविण्यात मोलाची मदत करू शकतात. विजय दणकेबाज सुरुवात करून देऊ शकतो. मानसिकरीत्या तो चांगला खेळाडू असल्यामुळे विजयकडून आशा आहेत.’’ रहाणेचे कौतुक करीत कोहली म्हणाला, ‘‘फलंदाज या नात्याने अजिंक्य माझी पसंती आहे. याशिवाय तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. (वृत्तसंस्था) कसोटी कर्णधार या नात्याने ही माझी पहिली मालिका असेल. बांगलादेशात केवळ एकच कसोटी खेळायची होती, त्यामुळे ती पूर्ण मालिका नव्हती. संघात अनेक चेहरे नवे आणि युवा आहेत. काहींना आपली कारकीर्द घडवायची असल्याने ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. चांगली तयारी झाल्यास आणि जिंकायची दृष्टी बाळगून खेळल्यास लंकेत बीसीसीआयने दिलेल्या जबाबदारीच्या कसोटीवर खरा ठरण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. -विराट कोहली