शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

नेहमी जबाबदारीचे भान ठेवतो : कोहली

By admin | Updated: August 2, 2015 01:30 IST

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये दिसत नाही. पण, नेहमी जबाबदारीचे भान ठेवून संघासाठी खेळत असल्याने अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण

चेन्नई : गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सर्वश्रेष्ठ फॉर्ममध्ये दिसत नाही. पण, नेहमी जबाबदारीचे भान ठेवून संघासाठी खेळत असल्याने अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण कसोटी कर्णधार असलेल्या कोहलीने दिले आहे. आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध शनिवारी संपलेल्या चार दिवसांच्या अनधिकृत सामन्यात विराटने १६ आणि ४५ धावांचे योगदान दिले. यजमान संघाला या सामन्यात १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला. भारताने यंदा खूप कसोटी सामने खेळले नाहीत. वन-डेतही कोहलीच्या कामगिरीत चढ-उतार पाहायला मिळाले. त्याने वन-डेत फेब्रुवारीपासून एकही शतक ठोकलेले नाही. १२ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या लंका दौऱ्यात सूर गवसावा यासाठी आक्रमकतेवर संयम राखावा लागेल का, असा सवाल करताच कोहलीने स्पष्टपणे नकार दिला. तो म्हणाला, ‘‘फलंदाज म्हणून नेहमी जबाबदारीने खेळतो. खेळताना संघाचा विजय कसा होईल, याचा विचार मनात असतो. धावा काढण्यासाठी आक्रमकतेत बदल करण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. क्रिकेट खेळताना फलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण, माझे काम १०० टक्के योगदान देणे हेच आहे. संपूर्ण जबाबदारीचे भान ठेवून खेळत असल्याने कुठलाही बदल न करता यापुढेही आक्रमक खेळत राहीन.’’ लंका दौऱ्यात भारताला तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. यावर कोहली म्हणाला, ‘‘प्रथमच संपूर्ण दौऱ्यात भारताचे नेतृत्व करण्यास मी उत्साही आहे.’’ भारत ‘अ’ संघात कोहली राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळला. याचा फार लाभ झाल्याचे कोहलीने सांगितले. राहुल द्रविडसारख्या महान खेळाडूच्या मार्गदर्शनात खेळण्याचा शांतप्रिय अनुभव मी घेतला आहे. राहुलला पाहिल्यानंतरच तुम्हाला बरेच काही शिकायला मिळते, असे कोहलीचे मत होते. या सामन्यात खेळण्याच्या निर्णयासंदर्भात तो म्हणाला, ‘‘लंका दौऱ्याआधी सूर गवसावा, अशी यामागे भावना होती. त्याआधी तीन आठवडे बऱ्यापैकी विश्रांतीदेखील मिळाली आहे. आता लंका दौऱ्यासाठी सर्वोत्कृष्ट तयारी करू.’’ संघातील सहकाऱ्यांबाबत तो म्हणाला, ‘‘मुरली विजय, अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग आणि रविचंद्रन अश्विन हे सामना फिरविण्यात मोलाची मदत करू शकतात. विजय दणकेबाज सुरुवात करून देऊ शकतो. मानसिकरीत्या तो चांगला खेळाडू असल्यामुळे विजयकडून आशा आहेत.’’ रहाणेचे कौतुक करीत कोहली म्हणाला, ‘‘फलंदाज या नात्याने अजिंक्य माझी पसंती आहे. याशिवाय तो उत्तम क्षेत्ररक्षकही आहे. (वृत्तसंस्था) कसोटी कर्णधार या नात्याने ही माझी पहिली मालिका असेल. बांगलादेशात केवळ एकच कसोटी खेळायची होती, त्यामुळे ती पूर्ण मालिका नव्हती. संघात अनेक चेहरे नवे आणि युवा आहेत. काहींना आपली कारकीर्द घडवायची असल्याने ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. चांगली तयारी झाल्यास आणि जिंकायची दृष्टी बाळगून खेळल्यास लंकेत बीसीसीआयने दिलेल्या जबाबदारीच्या कसोटीवर खरा ठरण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. -विराट कोहली