शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

संघातील सर्वच खेळाडू ‘मॅच विनर’

By admin | Updated: March 7, 2016 23:26 IST

बांगलादेशवर मात करीत आशिया कप जिंकणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आघाडीच्या फळीतील फलंदाजांची प्रशंसा करताना संघातील सर्वच खेळाडू मॅचविनर असल्याचे सांगितले आहे.

मीरपूर : बांगलादेशवर मात करीत आशिया कप जिंकणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आघाडीच्या फळीतील फलंदाजांची प्रशंसा करताना संघातील सर्वच खेळाडू मॅचविनर असल्याचे सांगितले आहे.भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा आशिया कप जिंकला. याआधी धोनीच्या नेतृत्वात २0१0 मध्ये आशिया कप जिंकला होता; परंतु तेव्हा ही स्पर्धा ५0 षटकांची होती. ही स्पर्धा प्रथमच ट्वेंटी-२0 झाली आणि भारताने यात बाजी मारली.धोनीने म्हटले, ‘‘संघ सलग जिंकताना पाहणे सुखद आहे. संघाने शानदार कामगिरी करताना या वर्षी ११ ट्वेंटी-२0 पैकी १0 सामने जिंकले आहे. जे की विश्वकपआधी आमच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारा आहे. संघ सध्या शानदार लयीत आहे आणि मेगा स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा शानदार मिलाफ आहे आणि सर्वच मॅचविनर असल्याचे सिद्ध होत आहे.’’ धोनीने केली विक्रमाची बरोबरीट्वेंटी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जास्त सामन्यांत कर्णधारपद भूषवण्याचे रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या धोनीने या खेळाच्या झटपट फॉरमॅटमध्ये सलग सर्वात जास्त सामने जिंकण्याच्या आपल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या वर्षी ११ पैकी १0 सामने जिंकले आहेत. धोनी सलग सात सामने जिंकला आहे आणि त्याने ट्वेंटी २0 मध्ये सर्वाधिक सात सामने जिंकण्याच्या आपल्या विक्रमाची बरोबरी केली. धोनीने आशिया कप फायनलमध्ये यजमान बांगलादेशला आठ विकेटने पराभूत करीत आपला सलग सातवा विजय मिळवला आहे.धोनीने त्याचबरोबर सहाव्यांदा आशिया कपवर कब्जा मिळवला आहे आणि श्रीलंकेला मागे टाकले आहे. श्रीलंकेने पाच वेळेस या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. धोनी आता एकमेव असा कर्णधार बनला आहे की ज्याने आशिया कप ५0-५0 आणि ट्वेंटी -२0 फॉरमॅटमध्ये विजेतेपद पटकावले आहे. भारताने आशिया कपमध्ये विजेतेपद पटकावताना सलग पाच सामने जिंकले. (वृत्तसंस्था)त्याआधी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध घरच्या मालिकेत २-१ च्या विजयात सलग दोन सामने जिंकले होते. ट्वेंटी-२0 मध्ये सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम संयुक्त रूपाने इंग्लंड आणि आयर्लंड या संघाच्या नावावर असून धोनीला ट्वेंटी-२0 वर्ल्डकपमध्ये हा विक्रम मोडण्याची संधी असेल.()मोहम्मद शमी जर टी-२0 वर्ल्डकपसाठी फिट झाला तरीही महेंद्रसिंह धोनीच्या नुसार जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरा यांचे स्थान घेणे कठीण आहे. कारण संघ जास्त समतोल आहे. धोनी म्हणाला, शमी तंदुरुस्त आहे अथवा नाही हे आम्हाला माहीत नाही. अजून त्याच्याजवळ वेळ आहे. त्यामुळे त्याला निवडण्यात आले होते. कारण त्याच्यात क्षमता आहे. तो नवीन आणि जुन्या चेंडूने यॉर्कर टाकू शकतो; परंतु बुमराहची जागा घेणे त्याच्यासाठी कठीण आहे. कारण त्याने चांगली कामगिरी केली. हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाज व अष्टपैलू आहे. शमी फक्त आशिष नेहराची जागा घेऊ शकतो. कारण हे खूप कठीण आहे. आशिषने चांगली कामगिरी केली आहे.टीका करणे सोपेमहेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेताना क्रिकेटमध्ये भारतातील लोक व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग करीत असल्याचे म्हटले. बांगलादेशवर आठ गडी राखून आशिया कप जिंकल्यानंतर तो म्हणाला, भारतातील प्रत्येक प्रकरणावर व विशेषत: क्रिकेटवर एक मत असते. वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे खेळा, तसे खेळा, हे करा, ते करा. विशेष म्हणजे क्रिकेट टीव्हीवर पाहताना सोपे दिसते; परंतु मैदानावर तसे नसते. टीका तर होणारच.