शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोहली-शास्त्रीकडे असेल सर्वांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:20 IST

मोठ्या वादानंतर प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर टीम इंडिया अखेर श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला गेलेल्या भारतीय

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)मोठ्या वादानंतर प्रशिक्षकाची निवड झाल्यानंतर टीम इंडिया अखेर श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाली. दोन वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला गेलेल्या भारतीय संघाने श्रीलंकेला त्यांच्याच देशात पराभूत केले होते. त्या वेळी, रवी शास्त्री संघाचे निर्देशक होते आणि आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. महत्त्वाचे म्हणजे श्रीलंकेला त्यांच्या भूमीमध्ये नमवणे सोपे नाही.विशेष म्हणजे, २२ वर्षांनंतर भारतीयांनी लंकेत मालिका विजय मिळवला होता. या वेळी काय होणार?लंकेचा यंदाचा संघ तुलनेत कमजोर दिसत आहे. नुकताच त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध रोमांचक विजय मिळवला असला, तरी त्यांचा संघ तेवढा बलाढ्य दिसत नाही. त्यांच्याकडे म्हणावे तसे चांगले फलंदाज आणि गोलंदाज नाही. पण, ही एक संधीदेखील आहे की जी नवीन जोडी मिळाली आहे त्या जोरावर भारताने आगामी आॅस्टे्रलिया, दक्षिण आफ्रिकासारख्या मोठ्या दौऱ्यासाठी चांगले तयार व्हावे. तसेच, एकप्रकारचे दडपणही असेल, ते म्हणजे रँकिंमध्ये भारत आघाडीवर आहे, संघात अनेक स्टार्स आहेत, प्रशिक्षक व कर्णधाराची जोडी पुन्हा एकत्र आले आहेत, त्यामुळे भारतीय संघाने चांगली कामगिरी करावी ही अपेक्षा चाहत्यांनी बाळगली आहे.माझ्या मते संघातील फलंदाजी व गोलंदाजीचा ताळमेळ जबरदस्त आहे. श्रीलंकेत खूप खेळले असल्याने तेथील वातावरणाचीही खेळाडूंना फारशी चिंता नसेल. पण, सुरुवातीपासूनच चांगली लय पकडणे हे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे, तसेच श्रीलंकेला संधी देता कामा नये. कारण, जर का लंकेला संधी मिळाल, तर ते घरच्या मैदानाचा फायदा उचलत भारतीय संघाला अडचणीत आणू शकतील. श्रीलंकेमध्ये कोहली आणि शास्त्री यांचे सर्वांत जास्त लक्ष असेल ते गोलंदाजीकडे. कारण, जर तुम्हाला विदेशात मालिका जिंकायची असेल, तर तुम्हाला फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांची कामगिरी प्रभावी होणे महत्त्वाचे असते. दरम्यान, ही मालिका उपखंडात असल्याने फिरकीपटू चमक पाडतील. मात्र, जेव्हा भारत दक्षिण आफ्रिका व आॅस्टे्रलिया दौऱ्यावर जाईल, तेव्हा फिरकी व वेगवान गोलंदाजांमध्ये ताळमेळ होणे अत्यंत आवश्यक होईल. त्याचबरोबर, फलंदाजीमध्ये मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्याने सलामीवीर म्हणून शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सलामीजोडीमध्ये थोडा लवचिकपणा दिसत आहे. शिवाय, स्वत: कोहली धाव बनविण्यात उत्सुक असेल, कारण पुढे आफ्रिका आण आॅस्टे्रलियासारखे अत्यंत महत्त्व दौरे आहेत. तसेच, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सातत्य असणे भारतासाठी गरजेचे असेल. दुसरीकडे, कोहली आणि कुंबळे यांची विचारसरणी व आता कोहली आणि शास्त्री यांच्यात खूप तफावत असेल. तसेच, पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष कोहली - शास्त्री या जोडीकडे असेल. याआधी जी कामगिरी केलेली, ती एक - दीड वर्षापूर्वीची होती आणि ती आता विसरून जायला पाहिजे. आता नवी इनिंग सुरू झाली आहे. ही पार्टनरशीप नक्कीच जुनी आहे, पण आव्हानं मात्र नवी आहेत.