शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

अजिंक्य रहाणेला सर्वच प्रकारात खेळवा

By admin | Updated: December 8, 2015 02:17 IST

एबीला सलाम. डिव्हिलियर्सने कुठल्याही प्रकारात खेळण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. हा तोच खेळाडू ज्याने मुंबई येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा मारा चोपून काढला होता.

एबीला सलाम. डिव्हिलियर्सने कुठल्याही प्रकारात खेळण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. हा तोच खेळाडू ज्याने मुंबई येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा मारा चोपून काढला होता. फिरोज शाहा कोटला मैदानावर मात्र हाच एबी संघाला सुस्थिती गाठून देण्यासाठी लढत होता. तो खडकाप्रमाणे अभेद्य होता, पण त्याला सामना अनिर्णीत राखून देण्यात अपयश आले, पण त्याची संयमी फलंदाजी मात्र कायम स्मरणात राहील. क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारत तो जगात सर्वोत्तम आहे, यात वादच नाही. आक्रमक फलंदाजाच्या या अवताराबाबत उत्सुकता वाटली. कारण तो प्रत्येक चेंडू थोपविण्याचा प्रयत्न करीत होता. आजच्या खेळीवरून फलंदाज म्हणून त्याच्या क्षमतेची प्रचिती आली. त्याचप्रमाणे मनावर त्याचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसून आले. प्रत्येक चेंडू थोपविणे म्हणजे नकारात्मक रणनीती होती. त्यांनी रविवारी भारतीय संघाविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला असता तर यजमान संघावर दडपण आणता आले असते. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, पण तुम्ही नकारात्मक पवित्रा स्वीकारला तर कुठल्याही क्षणी बाद होण्याचा धोका असतो. पण, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला ३-० ने पराभूत केल्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन. कर्णधार विराट कोहली अ‍ॅण्ड कंपनीचे विशेष अभिनंदन. त्यांची ही कामगिरी संस्मरणीय आहे. माझ्या मते उभय संघांसाठी खेळपट्ट्या सारख्याच होत्या. पण, दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या दोन सामन्यानंतर मानसिकदृष्ट्या पराभूत झाला होता. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी अपयशी ठरली असली तरी त्यांच्या गोलंदाजांनी मात्र तुल्यबळ लढत दिली. अमलाचा नकारात्मक पवित्रा सामना अनिर्णीत राहील किंवा भारत जिंकेल, असा दर्शविणारा होता. त्याने चांगले फटके मारावेत असे मनोमन वाटत होते. चेंडू कसा येतो आहे हे ओळखून तो खेळू शकला असता पण असे घडले नाही. हा पवित्रा योग्य नव्हताच. या मालिकेत भारताने आफ्रिकेला चारीमुंड्या चीत केले आहे. कसोटी सामन्यादरम्यान प्रत्येक कसोटीत दरदिवशी भारताने तीनपैकी दोन सत्रात वर्चस्व गाजविले हेच खरे.आफ्रिका साधारणपणे आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळतो पण या मालिकेत त्यांची मानसिकता पराभूताची होती. या सामन्यात किमान आक्रमकपणा दाखवायला हवा होता पण तो भारताने दाखविला. रिव्हर्स स्विंगमध्ये उमेशने मला प्रभावित केले. मी त्याचा मारा पहातच राहिलो. चाहत्यांच्या दडपणात सुरेख कामगिरी करण्याबद्दल दबाव होता पण मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता विदेशात हा संघ कशी कामगिरी करतो यावर भारताची कसोटीत वाटचाल अवलंबून असेल. या मालिकेत रविचंद्रन अश्विनने सर्वांचे लक्ष वेधले. अजिंक्य रहाणेचेही तंत्र आणि स्ट्रोक्स मनाला भावले. अजिंक्यसारखे खेळाडू इतरही संघात असतील तर त्यांना प्रत्येक प्रकारात खेळवायला हवे. भारतही अजिंक्यला सर्वच प्रकारात संधी देऊ शकतो. माझ्या स्मरणात असलेली लॉडर््सवरील त्याची खेळी अप्रतिम होती. (टीसीएम)