शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

आक्रमक खेळणे उपयुक्त ठरणार नाही : जाधव

By admin | Updated: May 30, 2017 01:05 IST

कारकिर्दीत प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळण्यासाठी केदार जाधव उत्सुक असणे स्वाभाविक आहे, पण इंग्लंडमधील

लंडन : कारकिर्दीत प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळण्यासाठी केदार जाधव उत्सुक असणे स्वाभाविक आहे, पण इंग्लंडमधील परिस्थितीमध्ये पूर्णपणे आक्रमक पवित्रा स्वीकारणे उपयुक्त ठरणार नाही, याची त्याला कल्पना आहे. जाधवला रविवारी न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पहिल्या सराव सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण तरी या लढतीच्यानिमित्ताने त्याला बरेच काही शिकता आले. मंगळवारी बांगलादेशविरुद्ध भारताच्या दुसऱ्या सराव सामन्यापूर्वी बोलताना जाधव म्हणाला, ‘‘रविवारच्या लढतीत प्रत्येक धाव घेण्यासाठी फलंदाजांना मेहनत घ्यावी लागत असल्याचे दिसून आले. परिस्थितीमध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे फलंदाजांना ताळमेळ साधण्यास अडचण भासत होती.’’ बदलणाऱ्या वातावरणामध्ये भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीवर वेळ घालवित संघाला सहज विजय मिळवून दिला. जाधव म्हणाला, ‘‘खेळपट्टीवर हिरवळ होती आणि वातावरण बदलत असल्यामुळे चेंडू स्विंग होत होता. परिस्थिती अशीच असेल तर आगामी सामन्यांमध्ये आक्रमक पवित्रा स्वीकारता येईल, पण तंत्राचा विचार करता कसोटी सामना किंवा रणजी ट्रॉफी सामन्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल.’’ (वृत्तसंस्था)