शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

पुन्हा ‘बिनधास्त’ युवी, धोनी बघायला मिळेल

By admin | Updated: January 10, 2017 01:51 IST

भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पर्याय ठरलेल्या युवराज सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पर्याय ठरलेल्या युवराज सिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. धोनी आता जुन्या दिवसांची आठवण ताजी करीत पुन्हा बेदरकार वृत्तीने क्रिकेट खेळताना दिसेल, असा विश्वास युवराजने व्यक्त केला. युवराज म्हणाला, ‘आम्ही जसे सुरुवातीला खेळत होतो ते दिवस पुन्हा येतील. मी त्याच्या तुलनेत पूर्वीच सुरुवात केली होती. युवराजने २००० मध्ये, तर धोनीने २००४ मध्ये पदार्पण केले होते, पण आम्ही सोबत खेळत असताना बेदरकारपणे खेळत होतो. आम्ही आगामी मालिकेत याच पद्धतीने खेळू शकतो.’धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वकप विजेत्या संघाचा (२00७ व २०११) महत्त्वाचा खेळाडू ठरलेल्या युवराजने एक खेळाडू व कर्णधार म्हणून धोनीच्या योगदानाची प्रशंसा केली. युवराज म्हणाला, ‘आमच्या संघाने अव्वल स्थान पटकाविले. दोनदा विश्वविजेतेपद पटकाविणे, ही कामगिरी प्रशंसनीय आहे. किती कर्णधारांनी अशी कामगिरी केली, याची मला नक्की माहिती नाही. धोनी शांतचित्त व अनुभवी कर्णधार होता.’ कर्णधारपद सोडण्याचा धोनीचा निर्णय योग्यच आहे, असे सांगून युवराज म्हणाला ‘२०१९च्या विश्वकप स्पर्धेसाठी संघ तयार करण्यासाठी युवा खेळाडूने नेतृत्व करणे आवश्यक आहे, असा विचार त्याच्या मनात आला असावा. त्यासाठी त्याने विराटच्या नावाचा विचार केला असावा. ’संघात पाचव्यांदा पुनरागमन करीत असलेल्या युवराजच्या मते, विराट कोहली स्वत:च्या कामगिरीद्वारे अन्य खेळाडूंना प्रेरित करू शकतो. विराटचा विचार करता मी त्याला युवा खेळाडूपासून अनुभवी खेळाडू होताना बघितले आहे. तो सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. कामगिरीच्या जोरावर तो चांगला कर्णधार ठरला आहे. विराटला संघाकडून प्रत्येकवेळी अनुकूल निकाल अपेक्षित असतो. एका चांगल्या कर्णधाराचे ते लक्षण आहे. त्याच्या कामगिरीत प्रत्येक वर्षी सुधारणा होत आहे. त्याने कामगिरी सुधारण्यासाठी लक्ष्य निश्चित केलेले असावे. सुरुवातीला तो खोऱ्याने धावा वसूल करीत होता आणि शतके झळकावीत होता. यंदा त्याने द्विशतके झळकाविण्यास सुरुवात केली आहे. विराट वगळता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत कुणाची सरासरी ५० पेक्षा अधिक आहे, याची मला कल्पना नाही. भविष्यातही विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरेल आणि भारतीय क्रिकेटची आगेकूच सुरू राहील, अशी आशा आहे. - युवराज सिंग