शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

रिओतील अपयशानंतर निवृत्तीचा विचार होता - चानू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 03:48 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या सैखोम मीराबाई चानू हिने सांगितले.विश्व चॅम्पियनशिपमध्ये कर्णम मल्लेश्वरीनंतर सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली चानू म्हणाली की, ‘आॅलिम्पिकनंतर वास्तवत: मी खूप हताश झाली होती. या निराशेतून सावरण्यास मला खूप वेळ लागला. एवढेच नव्हे तर हा खेळ सोडण्याचा आणि सराव न करण्याविषयी विचार करीत होते. सोशल मीडियावर होणाºया मत आणि माझ्या प्रशिक्षकांवरील टीकेमुळे मला वाईट वाटत होते. परिस्थिती कशी अनुकूल होईल याचा मी दिवसरात्र विचार करीत होते. मी नंतर पहिल्यापेक्षा चांगले करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळेच मी टीकाकारांचे तोंड बोंद करू शकत होते. याच विचाराने मी सावरू शकत होते.’मणीपूरच्या या २३ वर्षीय खेळाडूने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अनाहीम येथे २२ वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. तिने १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन व जर्कमध्ये १०९ किलो) उचलताना नवीन विश्वविक्रमही रचला होता. आपले कौशल्यावर काम केले आणि रिओतून सावरण्यासाठी मनोचिकित्सकाची मदत घेतल्याचे चानू सांगते. ती म्हणाली की, ‘मी आॅलिम्पिकमध्ये खराब कामगिरी केली. मी क्लीन आणि जर्कमध्ये अपयशी ठरले. मी माझ्या प्रशिक्षकांशी याविषयी चर्चा केली आणि सरावादरम्यान आपल्या कौशल्यात बदल केले. मनोचिकित्सकनेदेखील मोठी भूमिका बजावली. मी आॅलिम्पिकनंतर प्रत्येक महिन्यात दोनदा मनोचिकित्सकांकडे जात होते आणि त्यामुळे मला खरंच मदत झाली. विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आता साकार केले आहे.’