शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रिओतील अपयशानंतर निवृत्तीचा विचार होता - चानू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 03:48 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या सैखोम मीराबाई चानू हिने सांगितले.विश्व चॅम्पियनशिपमध्ये कर्णम मल्लेश्वरीनंतर सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली चानू म्हणाली की, ‘आॅलिम्पिकनंतर वास्तवत: मी खूप हताश झाली होती. या निराशेतून सावरण्यास मला खूप वेळ लागला. एवढेच नव्हे तर हा खेळ सोडण्याचा आणि सराव न करण्याविषयी विचार करीत होते. सोशल मीडियावर होणाºया मत आणि माझ्या प्रशिक्षकांवरील टीकेमुळे मला वाईट वाटत होते. परिस्थिती कशी अनुकूल होईल याचा मी दिवसरात्र विचार करीत होते. मी नंतर पहिल्यापेक्षा चांगले करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळेच मी टीकाकारांचे तोंड बोंद करू शकत होते. याच विचाराने मी सावरू शकत होते.’मणीपूरच्या या २३ वर्षीय खेळाडूने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अनाहीम येथे २२ वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. तिने १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन व जर्कमध्ये १०९ किलो) उचलताना नवीन विश्वविक्रमही रचला होता. आपले कौशल्यावर काम केले आणि रिओतून सावरण्यासाठी मनोचिकित्सकाची मदत घेतल्याचे चानू सांगते. ती म्हणाली की, ‘मी आॅलिम्पिकमध्ये खराब कामगिरी केली. मी क्लीन आणि जर्कमध्ये अपयशी ठरले. मी माझ्या प्रशिक्षकांशी याविषयी चर्चा केली आणि सरावादरम्यान आपल्या कौशल्यात बदल केले. मनोचिकित्सकनेदेखील मोठी भूमिका बजावली. मी आॅलिम्पिकनंतर प्रत्येक महिन्यात दोनदा मनोचिकित्सकांकडे जात होते आणि त्यामुळे मला खरंच मदत झाली. विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आता साकार केले आहे.’