शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

रिओतील अपयशानंतर निवृत्तीचा विचार होता - चानू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 03:48 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर होणाºया टीकेमुळे एक वेळ हा खेळ सोडण्याचा आपण विचार करीत होतो, असे विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या सैखोम मीराबाई चानू हिने सांगितले.विश्व चॅम्पियनशिपमध्ये कर्णम मल्लेश्वरीनंतर सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरलेली चानू म्हणाली की, ‘आॅलिम्पिकनंतर वास्तवत: मी खूप हताश झाली होती. या निराशेतून सावरण्यास मला खूप वेळ लागला. एवढेच नव्हे तर हा खेळ सोडण्याचा आणि सराव न करण्याविषयी विचार करीत होते. सोशल मीडियावर होणाºया मत आणि माझ्या प्रशिक्षकांवरील टीकेमुळे मला वाईट वाटत होते. परिस्थिती कशी अनुकूल होईल याचा मी दिवसरात्र विचार करीत होते. मी नंतर पहिल्यापेक्षा चांगले करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यामुळेच मी टीकाकारांचे तोंड बोंद करू शकत होते. याच विचाराने मी सावरू शकत होते.’मणीपूरच्या या २३ वर्षीय खेळाडूने गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अनाहीम येथे २२ वर्षांनंतर भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. तिने १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन व जर्कमध्ये १०९ किलो) उचलताना नवीन विश्वविक्रमही रचला होता. आपले कौशल्यावर काम केले आणि रिओतून सावरण्यासाठी मनोचिकित्सकाची मदत घेतल्याचे चानू सांगते. ती म्हणाली की, ‘मी आॅलिम्पिकमध्ये खराब कामगिरी केली. मी क्लीन आणि जर्कमध्ये अपयशी ठरले. मी माझ्या प्रशिक्षकांशी याविषयी चर्चा केली आणि सरावादरम्यान आपल्या कौशल्यात बदल केले. मनोचिकित्सकनेदेखील मोठी भूमिका बजावली. मी आॅलिम्पिकनंतर प्रत्येक महिन्यात दोनदा मनोचिकित्सकांकडे जात होते आणि त्यामुळे मला खरंच मदत झाली. विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आता साकार केले आहे.’