शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
4
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
5
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
7
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
8
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
9
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
10
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
11
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
12
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
13
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
14
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
15
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
16
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
17
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
18
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
19
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
20
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

पराभवानंतर पाकसमर्थकांनी जाळले खेळाडूंचे पुतळे!

By admin | Updated: March 22, 2015 01:11 IST

आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे.

कराची : आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. या चाहत्यांनी देशभरात टीव्ही संचांची मोडतोड केली, शिवाय खेळाडूंचे पुतळेही जाळले. दारुण पराभवानंतर चाहत्यांनी विरोध दर्शवीत खेळाडूंच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. निराश चाहत्यांनी टीव्ही संच फोडलेच, शिवाय चेंडू-बॅट व क्रिकेटच्या अन्य सामानाचीही होळी केली. पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी मात्र संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याचे सांगून उपांत्यपूर्व सामन्यातील कामगिरी निराशाजनक झाल्याचे म्हटले आहे. जखमांमुळे काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या झुंजीचीही त्यांनी प्रशंसा केली. पाकच्या माजी खेळाडूंनी या पराभवासाठी कर्णधार मिस्बाह उल हक, मुख्य कोच वकार युनूस आणि पीसीबीला धारेवर धरले. माजी कर्णधार आणि फलंदाज मोहम्मद युसूफ म्हणाला,‘‘इतकी वर्षे कर्णधारपद भूषविल्यानंतरही मिस्बाह संघाबाबत ठोस निर्णय घेऊ शकला नाही, हे दुर्दैव आहे. याचा फटका संघाला बसला. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कुठले खेळाडू हवे, हे कोच व कर्णधाराला माहीत असावे. या संघात राहत अली आणि सोहेल खान यांचा समावेश होता, पण मजेची बाब अशी की दोन्ही खेळाडूंचा संभाव्य ३० जणांमध्ये समावेश नव्हताच.’’ माजी कसोटी कर्णधार आमिर सोहेल याने पाक क्वार्टर फायनलच्या पुढे जाणारच नव्हता, असा दावा केला. तो म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर या संघाने उपांत्यपूर्व सामना खेळला ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल.’’ माजी कर्णधार रशीद लतिफ म्हणाला, ‘व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका संघाला बसला आहे. व्यवस्थापनाने काही मोठ्या चुका केल्या आणि खेळाडू जखमी झाले, त्याचाही विपरीत परिणाम संघावर झाला.’’ (वृत्तसंस्था) आम्हाला माफ करा!मी दु:खी आहे. पराभवाबद्दल देशातील जनतेची माफी मागतो. आमच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आम्ही सामना जिंकू शकलो असतो, पण कमी पडलो. पुन्हा उभे राहण्यासाठी चाहत्यांचा पाठिंबा हवा आहे.- वहाब रियाझ, पाकचा वेगवान गोलंदाज