शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतर पाकसमर्थकांनी जाळले खेळाडूंचे पुतळे!

By admin | Updated: March 22, 2015 01:11 IST

आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे.

कराची : आॅस्ट्रेलियाकडून उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होऊन विश्वचषकाबाहेर पडलेल्या पाकिस्तान संघातील खेळाडूंवर चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. या चाहत्यांनी देशभरात टीव्ही संचांची मोडतोड केली, शिवाय खेळाडूंचे पुतळेही जाळले. दारुण पराभवानंतर चाहत्यांनी विरोध दर्शवीत खेळाडूंच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. निराश चाहत्यांनी टीव्ही संच फोडलेच, शिवाय चेंडू-बॅट व क्रिकेटच्या अन्य सामानाचीही होळी केली. पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी मात्र संघाची कामगिरी समाधानकारक झाल्याचे सांगून उपांत्यपूर्व सामन्यातील कामगिरी निराशाजनक झाल्याचे म्हटले आहे. जखमांमुळे काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या झुंजीचीही त्यांनी प्रशंसा केली. पाकच्या माजी खेळाडूंनी या पराभवासाठी कर्णधार मिस्बाह उल हक, मुख्य कोच वकार युनूस आणि पीसीबीला धारेवर धरले. माजी कर्णधार आणि फलंदाज मोहम्मद युसूफ म्हणाला,‘‘इतकी वर्षे कर्णधारपद भूषविल्यानंतरही मिस्बाह संघाबाबत ठोस निर्णय घेऊ शकला नाही, हे दुर्दैव आहे. याचा फटका संघाला बसला. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कुठले खेळाडू हवे, हे कोच व कर्णधाराला माहीत असावे. या संघात राहत अली आणि सोहेल खान यांचा समावेश होता, पण मजेची बाब अशी की दोन्ही खेळाडूंचा संभाव्य ३० जणांमध्ये समावेश नव्हताच.’’ माजी कसोटी कर्णधार आमिर सोहेल याने पाक क्वार्टर फायनलच्या पुढे जाणारच नव्हता, असा दावा केला. तो म्हणाला, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे, तर या संघाने उपांत्यपूर्व सामना खेळला ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल.’’ माजी कर्णधार रशीद लतिफ म्हणाला, ‘व्यवस्थापनाच्या चुकीचा फटका संघाला बसला आहे. व्यवस्थापनाने काही मोठ्या चुका केल्या आणि खेळाडू जखमी झाले, त्याचाही विपरीत परिणाम संघावर झाला.’’ (वृत्तसंस्था) आम्हाला माफ करा!मी दु:खी आहे. पराभवाबद्दल देशातील जनतेची माफी मागतो. आमच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आम्ही सामना जिंकू शकलो असतो, पण कमी पडलो. पुन्हा उभे राहण्यासाठी चाहत्यांचा पाठिंबा हवा आहे.- वहाब रियाझ, पाकचा वेगवान गोलंदाज