शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

मुंबईचा क्वालिफायरमध्ये प्रवेश

By admin | Updated: May 14, 2017 07:26 IST

शनिवारचा दिवस हा आयपीएलच्या या सत्रातील दोन सर्वोत्तम सामन्यांचा दिवस होता. सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर विजय मिळवत

आकाश नेवे / आॅनलाइन लोकमत :कोलकाता, दि. 14 - शनिवारचा दिवस हा आयपीएलच्या या सत्रातील दोन सर्वोत्तम सामन्यांचा दिवस होता. सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर विजय मिळवत आपले प्ले आॅफमधील स्थान पक्के केले, तर मुंबईनेही केकेआरवर विजय मिळवत आपले अव्वल स्थान कायम राखले. २० गुणांसह मुंबई हा क्वालिफायरमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. या विजयात चमकला तो अंबाती रायडू. त्याने ३७ चेंडूत ६३ धावा करत मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. अखेरीस हीच बाब मुंबईला विजय मिळवून देणारी ठरली.अंबाती रायडू याचा या स्पर्धेतील दुसराच सामना होता, तर त्याची खंबीर साथ देणाऱ्या सौरभ तिवारीचा या सत्रातला पहिलाच सामना होता. मुंबईने या सामन्यात संघात बरेच बदल केले होते. पार्थिव पटेल, लसीथ मलिंगा, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्लेघन, हरभजन सिंह यांना बाहेर बसवले.फलंदाजीत केलेले बदल संघाच्या पथ्यावर पडले. मात्र, त्याचसोबत गोलंदाजी केलेले बदल संघाला काही प्रमाणात महागात पडले. मात्र, मुंबईनेच विजय मिळवल्याने याची फारशी चर्चा होणार नाही. बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूची फलंदाजी या सामन्यात इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा नक्कीच सरस होती. त्याने खणखणीत चौकार आणि षटकारलगावले. मात्र, त्याच्या एका चुकीमुळे सौरभ तिवारी धावबाद झाला आणि अखेरच्या षटकांत मुंबईची धावगती खुंटली.केकेआरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर सुनील नरेन भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र, गंभीर आणि लीन यांनी दडपण न घेता फलंदाजी केली. गंभीर बाद झाल्यावर मात्र कोणताही फलंदाज संघाला विजय मिळवून देण्याच्यादृष्टीने खेळपट्टीवर टिकून राहिला नाही. युसुफ पठाणने तीन षटकार लगावत आशा निर्माण केल्या, मात्र मोठी खेळी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. मनीष पांडेचे प्रयत्न योग्य साथ न मिळाल्याने अयशस्वी ठरले. केकेआरने या सामन्यातील पराभवामुळे गुणतक्त्यात तिसरे स्थान गाठले आहे. त्यामुळे केकेआरला आता अंतिम सामन्यात खेळण्यासाठी इलिमिनेटर आणि क्वालिफायर २ या सामन्यांत खेळावे लागणार आहे. प्ले आॅफच्या चौथ्या संघाचा निर्णय रविवारच्या पंजाब विरुद्ध पुणे या सामन्यानंतर लागेल.