शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

मुंबईचा क्वालिफायरमध्ये प्रवेश

By admin | Updated: May 14, 2017 07:26 IST

शनिवारचा दिवस हा आयपीएलच्या या सत्रातील दोन सर्वोत्तम सामन्यांचा दिवस होता. सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर विजय मिळवत

आकाश नेवे / आॅनलाइन लोकमत :कोलकाता, दि. 14 - शनिवारचा दिवस हा आयपीएलच्या या सत्रातील दोन सर्वोत्तम सामन्यांचा दिवस होता. सनरायजर्स हैदराबादने गुजरात लायन्सवर विजय मिळवत आपले प्ले आॅफमधील स्थान पक्के केले, तर मुंबईनेही केकेआरवर विजय मिळवत आपले अव्वल स्थान कायम राखले. २० गुणांसह मुंबई हा क्वालिफायरमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. या विजयात चमकला तो अंबाती रायडू. त्याने ३७ चेंडूत ६३ धावा करत मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला. अखेरीस हीच बाब मुंबईला विजय मिळवून देणारी ठरली.अंबाती रायडू याचा या स्पर्धेतील दुसराच सामना होता, तर त्याची खंबीर साथ देणाऱ्या सौरभ तिवारीचा या सत्रातला पहिलाच सामना होता. मुंबईने या सामन्यात संघात बरेच बदल केले होते. पार्थिव पटेल, लसीथ मलिंगा, नितीश राणा, जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्लेघन, हरभजन सिंह यांना बाहेर बसवले.फलंदाजीत केलेले बदल संघाच्या पथ्यावर पडले. मात्र, त्याचसोबत गोलंदाजी केलेले बदल संघाला काही प्रमाणात महागात पडले. मात्र, मुंबईनेच विजय मिळवल्याने याची फारशी चर्चा होणार नाही. बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूची फलंदाजी या सामन्यात इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा नक्कीच सरस होती. त्याने खणखणीत चौकार आणि षटकारलगावले. मात्र, त्याच्या एका चुकीमुळे सौरभ तिवारी धावबाद झाला आणि अखेरच्या षटकांत मुंबईची धावगती खुंटली.केकेआरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर सुनील नरेन भोपळाही न फोडता बाद झाला. मात्र, गंभीर आणि लीन यांनी दडपण न घेता फलंदाजी केली. गंभीर बाद झाल्यावर मात्र कोणताही फलंदाज संघाला विजय मिळवून देण्याच्यादृष्टीने खेळपट्टीवर टिकून राहिला नाही. युसुफ पठाणने तीन षटकार लगावत आशा निर्माण केल्या, मात्र मोठी खेळी करण्यात तो पुन्हा अपयशी ठरला. मनीष पांडेचे प्रयत्न योग्य साथ न मिळाल्याने अयशस्वी ठरले. केकेआरने या सामन्यातील पराभवामुळे गुणतक्त्यात तिसरे स्थान गाठले आहे. त्यामुळे केकेआरला आता अंतिम सामन्यात खेळण्यासाठी इलिमिनेटर आणि क्वालिफायर २ या सामन्यांत खेळावे लागणार आहे. प्ले आॅफच्या चौथ्या संघाचा निर्णय रविवारच्या पंजाब विरुद्ध पुणे या सामन्यानंतर लागेल.