शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बडोद्याविरुद्ध आदित्यच्या नेतृत्वाची कसोटी

By admin | Updated: January 29, 2015 06:40 IST

रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे

वडोदरा : रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे. सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवणाऱ्या मुंबईला आव्हान टिकवण्यासाठी यापुढील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यात हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्याची जबाबदारी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे याला पार पाडावी लागेल. सूर्यकुमार यादव याने कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यामुळे आदित्यकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आणि गुरुवारपासून सुरू होत असलेल्या बडोद्याविरुद्धच्या लढतीत त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. सहा सामन्यांत बडोदा संघाला केवळ एकच विजय मिळवता आला आहे, परंतु त्यांनी एकाही लढतीत पराभव पत्करला नसल्यामुळे त्यांच्या खात्यात १८ गुण जमा आहेत. दुसरीकडे मुंबईला सहा सामन्यांत एक विजय आणि दोन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे त्यांना ११ गुणांवर समाधान मानावे लागले़ तामिळनाडूकडून झालेल्या मानहानिकारक पराभवामुळे मुंबईचे मनोबल खचले आहे आणि त्यात नेतृत्वबदलामुळे संघाला यातून सावरण्यास अधिक काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत बडोदा संघाशी त्यांच्याच घरच्या मैदानावर मुंबईला दोनहात करायचे आहेत. या सामन्यावर आदित्यच्या नेतृत्वासह फलंदाजीवरही साऱ्यांच्या नजरा असतील. त्यामुळे नेतृत्वाबरोबर आदित्यला फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.