शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

बडोद्याविरुद्ध आदित्यच्या नेतृत्वाची कसोटी

By admin | Updated: January 29, 2015 06:40 IST

रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे

वडोदरा : रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे. सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवणाऱ्या मुंबईला आव्हान टिकवण्यासाठी यापुढील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यात हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्याची जबाबदारी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे याला पार पाडावी लागेल. सूर्यकुमार यादव याने कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यामुळे आदित्यकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आणि गुरुवारपासून सुरू होत असलेल्या बडोद्याविरुद्धच्या लढतीत त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. सहा सामन्यांत बडोदा संघाला केवळ एकच विजय मिळवता आला आहे, परंतु त्यांनी एकाही लढतीत पराभव पत्करला नसल्यामुळे त्यांच्या खात्यात १८ गुण जमा आहेत. दुसरीकडे मुंबईला सहा सामन्यांत एक विजय आणि दोन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे त्यांना ११ गुणांवर समाधान मानावे लागले़ तामिळनाडूकडून झालेल्या मानहानिकारक पराभवामुळे मुंबईचे मनोबल खचले आहे आणि त्यात नेतृत्वबदलामुळे संघाला यातून सावरण्यास अधिक काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत बडोदा संघाशी त्यांच्याच घरच्या मैदानावर मुंबईला दोनहात करायचे आहेत. या सामन्यावर आदित्यच्या नेतृत्वासह फलंदाजीवरही साऱ्यांच्या नजरा असतील. त्यामुळे नेतृत्वाबरोबर आदित्यला फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.