शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

बडोद्याविरुद्ध आदित्यच्या नेतृत्वाची कसोटी

By admin | Updated: January 29, 2015 06:40 IST

रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे

वडोदरा : रणजी करंडकावर ४० वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ ओढावली आहे. सहा सामन्यांत केवळ एकच विजय मिळवणाऱ्या मुंबईला आव्हान टिकवण्यासाठी यापुढील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यात हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलण्याची जबाबदारी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे याला पार पाडावी लागेल. सूर्यकुमार यादव याने कर्णधारपद तडकाफडकी सोडल्यामुळे आदित्यकडे ती जबाबदारी सोपविण्यात आली आणि गुरुवारपासून सुरू होत असलेल्या बडोद्याविरुद्धच्या लढतीत त्याच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. सहा सामन्यांत बडोदा संघाला केवळ एकच विजय मिळवता आला आहे, परंतु त्यांनी एकाही लढतीत पराभव पत्करला नसल्यामुळे त्यांच्या खात्यात १८ गुण जमा आहेत. दुसरीकडे मुंबईला सहा सामन्यांत एक विजय आणि दोन पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे त्यांना ११ गुणांवर समाधान मानावे लागले़ तामिळनाडूकडून झालेल्या मानहानिकारक पराभवामुळे मुंबईचे मनोबल खचले आहे आणि त्यात नेतृत्वबदलामुळे संघाला यातून सावरण्यास अधिक काळ लागू शकतो. अशा परिस्थितीत बडोदा संघाशी त्यांच्याच घरच्या मैदानावर मुंबईला दोनहात करायचे आहेत. या सामन्यावर आदित्यच्या नेतृत्वासह फलंदाजीवरही साऱ्यांच्या नजरा असतील. त्यामुळे नेतृत्वाबरोबर आदित्यला फलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.