शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

वसीम अक्रम जोड

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही.

विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही.
१९९२ व १९९९ मध्ये अनुक्रमे सिडनी व मॅन्चेस्टर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला २२० धावांचे लक्ष्यही गाठता आले नव्हते. १९९६ च्या लढतीत मी खेळलो नव्हतो. त्यानंतर २००३ मध्ये आम्हाला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला होता. माझी ती अखेरची स्पर्धा होती. सर्वसाधारण विचार करता पाकिस्तान संघाची भारतीय संघाविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, पण विश्वकप स्पर्धेत मात्र आम्हाला भारताविरुद्ध सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, रविवारी असेच काही घडेल अशी आशा आहे. मी हे केवळ पाकिस्तानी आहे म्हणून असे म्हणत नसून क्रिकेटचा एक जाणकार म्हणून मत व्यक्त करीत आहे.
आमच्या भागतील प्रत्येक वाहिनी व वृत्तपत्र आम्हाला याची आठवण करून देतात. पाकिस्तान संघातील खेळाडूंवर याचे दडपण नसावे, अशी आशा आहे. भारत-पाक लढत म्हणजे उभय संघातील खेळाडूंवर दडपण असणारच, हे नाकारता येत नाही.
पत्रकार परिषदेत रोहित शर्माने वक्तव्य केले होते की, पाकिस्तान संघावर अधिक दडपण राहील, पण उभय संघावर सारखेच दडपण राहणार आहे, हे मात्र नक्की.
जवळजवळ कोट्यवधी चाहते या लढतीचा थरार अनुभवणार आहेत. भारत-पाक क्रिकेटची ही खासियत आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान क्रिकेट सामने होणे किती गरजेचे आहे, हे कळते.