शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

वसीम अक्रम जोड

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही.

विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही.
१९९२ व १९९९ मध्ये अनुक्रमे सिडनी व मॅन्चेस्टर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला २२० धावांचे लक्ष्यही गाठता आले नव्हते. १९९६ च्या लढतीत मी खेळलो नव्हतो. त्यानंतर २००३ मध्ये आम्हाला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला होता. माझी ती अखेरची स्पर्धा होती. सर्वसाधारण विचार करता पाकिस्तान संघाची भारतीय संघाविरुद्धची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे, पण विश्वकप स्पर्धेत मात्र आम्हाला भारताविरुद्ध सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, रविवारी असेच काही घडेल अशी आशा आहे. मी हे केवळ पाकिस्तानी आहे म्हणून असे म्हणत नसून क्रिकेटचा एक जाणकार म्हणून मत व्यक्त करीत आहे.
आमच्या भागतील प्रत्येक वाहिनी व वृत्तपत्र आम्हाला याची आठवण करून देतात. पाकिस्तान संघातील खेळाडूंवर याचे दडपण नसावे, अशी आशा आहे. भारत-पाक लढत म्हणजे उभय संघातील खेळाडूंवर दडपण असणारच, हे नाकारता येत नाही.
पत्रकार परिषदेत रोहित शर्माने वक्तव्य केले होते की, पाकिस्तान संघावर अधिक दडपण राहील, पण उभय संघावर सारखेच दडपण राहणार आहे, हे मात्र नक्की.
जवळजवळ कोट्यवधी चाहते या लढतीचा थरार अनुभवणार आहेत. भारत-पाक क्रिकेटची ही खासियत आहे. त्यामुळे उभय संघांदरम्यान क्रिकेट सामने होणे किती गरजेचे आहे, हे कळते.