शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खोटे शपथपत्र सादर केल्याचा आरोप

By admin | Updated: September 30, 2015 23:48 IST

बीसीसीआयमधील वादावर कायदेशीर मत मागविण्यासाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी जे शपथपत्र सादर केले, त्यात खोटी तसेच अवास्तव माहिती दिल्याचा आरोप

नवी दिल्ली : बीसीसीआयमधील वादावर कायदेशीर मत मागविण्यासाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी जे शपथपत्र सादर केले, त्यात खोटी तसेच अवास्तव माहिती दिल्याचा आरोप करून आयसीसीचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.बीसीसीआय कार्य समितीच्या बैठकीत श्रीनिवासन यांना सहभागी करायचे अथवा नाही याबद्दल निर्देश द्यावेत, या आशयाचे शपथपत्र बीसीसीआयतर्फे ११ सप्टेंबर रोजी ठाकूर यांनी सादर केले होते. ठाकूर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात श्रीनिवासन हे अद्याप इंडिया सिमेंटचे ट्रस्टी असल्याने त्यांची दुहेरी भूमिका कायम असल्याचे तसेच दुसरीकडे श्रीनिवासन हे चेन्नईतील चार्टर्ड अकाउंटंट फर्मचे भागीदार असल्याचेही म्हटले होते. तथापि, श्रीनिवासन यांनी याचिकेत ‘बीसीसीआयकडे माझा सर्व रेकॉर्ड उपलब्ध असताना ठाकूर यांनी ‘राईचा पर्वत’ करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्या’चा आरोप केला. यावर श्रीनिवासन यांनी २००८मध्ये घटनादुरुस्ती झाली त्या वेळी ठाकूर हे स्वत: तसेच सध्याचे पंतप्रधान आणि गुजरात क्रिकेट संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र मोदी हेदेखील बैठकीला हजर होते, याकडे लक्ष वेधले आहे.ठाकूर यांनी कोलकाता येथे २८ आॅगस्ट रोजी झालेल्या बीसीसीआय कार्य समितीच्या बैठकीत श्रीनिवासन हे बळजबरीने शिरले असा दावा शपथपत्रात केला; पण श्रीनिवासन यांनी ठाकूर यांचा दावा खोटारडा असल्याचे म्हटले असून, आपल्या समर्थनार्थ बीसीसीआय कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी, उपाध्यक्ष टी. सी. मॅथ्यू आणि केरळ क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांचेही शपथपत्र जोडले आहे. या तिघांनी बैठक सुरू झाली, तेव्हा श्रीनिवासन हे बसले होते आणि त्यांच्या उपस्थितीवर कुणीही आक्षेप घेतला नसल्याचे म्हटले आहे.ठाकूर यांनी खोटे पुरावे सादर केले असून, त्यांच्या वैयक्तिक अर्जाला त्यांनी बीसीसीआयद्वारे सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोपही श्रीनिवासन यांनी याचिकेत केला आहे. श्रीनिवासन यांनी दाखल केलेल्या याचिकेतील आरोप सिद्ध झाल्यास दोषीला भादंविच्या १९३ आणि २०९ कलमानुसार किमान ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. (वृत्तसंस्था)