शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

अभिषेक वर्माला सुवर्ण तर सौरभ चौधरीला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 04:45 IST

नेमबाजी विश्वचषक : रौप्य पदकासह संजीव राजपूतने मिळवले आॅलिम्पिक तिकिट

रिओ : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात गुरुवारी अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने २४४.२ तर सौरभ चौधरीने २२१.९ गुणांची कमाई केली.

तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्यपदक कमावले. सौरभने यंदा पाच सुवर्णांची कमाई केली असून वर्षभरातील हे त्याचे सहावे आयएसएसएफ विश्वपदक होते. भारत पदकतालिकेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह अव्वल स्थानावर कायम आहे. चिंकी यादव २५ मीटर महिला पिस्तुलमध्ये अंतिम पात्रता मार्कपासून एका गुणाने माघारली. ती ५८४ गुणांसह दहाव्या स्थानी आली.अनुराज सिंग ५७९ गुणांसह २५ व्या आणि अभिज्ञा पाटील ५७२ गुणांसह ५३ व्या सञथानावर राहीली. चैनसिंग आणि पारूल कुमार यांना ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये क्रमश: ४९ आणि ५७ वे स्थान मिळाले. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी क्रमश: ५८० आणि ५८३ गुणांची कमाई केली. दोघींनीही आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. स्वप्निल कुसाळे व ऐश्वर्यसिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये ११६६ आणि ११६५ गुण संपादन केले. (वृत्तसंस्था)१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आॅलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चित केला आहे. याव्यतिरीक्त संजीव राजपूत याने ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन अंतिम फेरीमध्ये रौप्य जिंकून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे अडचण५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करीत आॅलिम्पिक कोटा मिळवला. गुण दर्शविणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याच्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आल्याने दडपण येताच तो त्रस्त होता. संजीवने स्वत: हा खुलासा केला.३८ वर्षांच्या संजीवने अंतिम फेरीत ४६२ गुणांची कमाई केली. तो क्रोएशियाचा पीटर गोर्सा (४६२.२) नंतर दुसºया स्थानी राहिला. संजीव म्हणाला, ‘मी संपूर्ण पात्रता फेरीदरम्यान त्रस्त होतो. माझ्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आला होता. याचा विरोध केला. यावर अतिरिक्त शॉट मंजूर होताच मी दहा गुण घेत पात्रता गाठली. माझे गुण ११८० नव्हे, तर ११८१ असायला हवे असे माझे मत होते.’ राजपूत अखेरच्या शॉटमध्ये थोडा मागे राहिल्याने त्याचे सुवर्ण हुकले. ‘दीर्घकाळानंतर फायनलमध्ये खेळल्याने माझ्यावर दडपण आले होते,’ असे त्याने रौप्य जिंकल्यानंतर सांगितले.