शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक वर्माला सुवर्ण तर सौरभ चौधरीला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 04:45 IST

नेमबाजी विश्वचषक : रौप्य पदकासह संजीव राजपूतने मिळवले आॅलिम्पिक तिकिट

रिओ : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात गुरुवारी अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने २४४.२ तर सौरभ चौधरीने २२१.९ गुणांची कमाई केली.

तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्यपदक कमावले. सौरभने यंदा पाच सुवर्णांची कमाई केली असून वर्षभरातील हे त्याचे सहावे आयएसएसएफ विश्वपदक होते. भारत पदकतालिकेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह अव्वल स्थानावर कायम आहे. चिंकी यादव २५ मीटर महिला पिस्तुलमध्ये अंतिम पात्रता मार्कपासून एका गुणाने माघारली. ती ५८४ गुणांसह दहाव्या स्थानी आली.अनुराज सिंग ५७९ गुणांसह २५ व्या आणि अभिज्ञा पाटील ५७२ गुणांसह ५३ व्या सञथानावर राहीली. चैनसिंग आणि पारूल कुमार यांना ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये क्रमश: ४९ आणि ५७ वे स्थान मिळाले. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी क्रमश: ५८० आणि ५८३ गुणांची कमाई केली. दोघींनीही आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. स्वप्निल कुसाळे व ऐश्वर्यसिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये ११६६ आणि ११६५ गुण संपादन केले. (वृत्तसंस्था)१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आॅलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चित केला आहे. याव्यतिरीक्त संजीव राजपूत याने ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन अंतिम फेरीमध्ये रौप्य जिंकून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे अडचण५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करीत आॅलिम्पिक कोटा मिळवला. गुण दर्शविणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याच्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आल्याने दडपण येताच तो त्रस्त होता. संजीवने स्वत: हा खुलासा केला.३८ वर्षांच्या संजीवने अंतिम फेरीत ४६२ गुणांची कमाई केली. तो क्रोएशियाचा पीटर गोर्सा (४६२.२) नंतर दुसºया स्थानी राहिला. संजीव म्हणाला, ‘मी संपूर्ण पात्रता फेरीदरम्यान त्रस्त होतो. माझ्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आला होता. याचा विरोध केला. यावर अतिरिक्त शॉट मंजूर होताच मी दहा गुण घेत पात्रता गाठली. माझे गुण ११८० नव्हे, तर ११८१ असायला हवे असे माझे मत होते.’ राजपूत अखेरच्या शॉटमध्ये थोडा मागे राहिल्याने त्याचे सुवर्ण हुकले. ‘दीर्घकाळानंतर फायनलमध्ये खेळल्याने माझ्यावर दडपण आले होते,’ असे त्याने रौप्य जिंकल्यानंतर सांगितले.