शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

२०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

By admin | Updated: April 4, 2015 04:06 IST

चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून

विशाल शिर्के , पुणे चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट देखील वेगवान झाले असल्याचे यंदाच्या विश्वचषकात पाहायला मिळाले. आयपीएलची ही खासियत टिकवून ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापक देखील आता अधिक गुणवान क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी अष्टपैलु खेळाडू घडविण्यावर अधिक भर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे लेव्हल थ्री प्रशिक्षक राकेश शर्मा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला...आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंना या स्पर्धेने एका छताखाली आणले आहे. इतकेच काय तर स्थानिक क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, ख्रिस गेल, रिकी पॉंटींग, विरेंद्र सेहवाग, यांसारख्या आजी-माजी खेळाडूंसमवेत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे अनुभव विश्वदेखील समृद्ध होण्यास मदत होत आहे. तसेच ज्या खेळाडूंना केवळ पडद्यावरच खेळताना पाहिले आहे, त्यांच्या बरोबर बसण्याची मिळालेली संधी देखील खेळाडूचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत करते. शर्मा म्हणाले, टी-टष्ट्वेन्टी मुळे क्रिकेट फलंदाजांचा खेळ झाला आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक संघाचा कल हा अष्टपैलु खेळाडू घडविण्याकडे असतो. कारण सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून वीस-पंचवीस धावा जमविल्यास संघाला ते फायदेशीर ठरु शकते. याचा अर्थ केवळ गोलंजाद हवा नसतो असे नाही. प्रत्येक सामन्यात सरासरी दोन बळी घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज, अथवा जॉन्टी ऱ्होड्स सारखा अफलातून क्षेत्ररक्षक असेल तरीही प्रतिस्पर्ध्यावर दडपण येतेच. त्यामुळे असा खेळाडू संघाना हवाच असतो. तसेच खेळाडू संघ अडचणीत असताना कशी कामगिरी करतो, दडपणात तो कसा खेळ कररु शकतो, केवळ फटकेबाजीचा विचार करतो की, फटका मारण्यास योग्य असलेल्या चेंडूची खेळाडू वाट पाहतो, याचाही विचार त्याची खेळाची पद्धत ठरविण्यास उपयोगी ठरते. एखादा खेळाडू जर सलग ३० ते ४० धावा काढून बाद होत असेल, तर तो लवकर आपला संयम घालवून बाद होतो की काय याचाही विचार केला जातो. त्या नुसार खेळाडूच्या कमकुवत बाजूवर काम केले जाते, असे शर्मा म्हणाले.