शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

२०-टष्ट्वेन्टीला हवेत अष्टपैलू खेळाडू...

By admin | Updated: April 4, 2015 04:06 IST

चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून

विशाल शिर्के , पुणे चौकार... षटकारांची आतषबाजी... धावांची होणारी बरसात..धुव्वाधार शतक...अर्धशतक..अशी वेगवान टी-टष्ट्वेन्टीची पर्वणी इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट देखील वेगवान झाले असल्याचे यंदाच्या विश्वचषकात पाहायला मिळाले. आयपीएलची ही खासियत टिकवून ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापक देखील आता अधिक गुणवान क्रिकेट टॅलेंट शोधण्यासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी अष्टपैलु खेळाडू घडविण्यावर अधिक भर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे लेव्हल थ्री प्रशिक्षक राकेश शर्मा यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला...आपले कौशल्य दाखविण्यासाठी स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जगभरातील उत्कृष्ट क्रिकेटपटूंना या स्पर्धेने एका छताखाली आणले आहे. इतकेच काय तर स्थानिक क्रिकेटपटूंना महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, राहुल द्रवीड, ख्रिस गेल, रिकी पॉंटींग, विरेंद्र सेहवाग, यांसारख्या आजी-माजी खेळाडूंसमवेत ड्रेसिंग रुम शेअर करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या खेळाडूंचे अनुभव विश्वदेखील समृद्ध होण्यास मदत होत आहे. तसेच ज्या खेळाडूंना केवळ पडद्यावरच खेळताना पाहिले आहे, त्यांच्या बरोबर बसण्याची मिळालेली संधी देखील खेळाडूचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत करते. शर्मा म्हणाले, टी-टष्ट्वेन्टी मुळे क्रिकेट फलंदाजांचा खेळ झाला आहे. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक संघाचा कल हा अष्टपैलु खेळाडू घडविण्याकडे असतो. कारण सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येवून वीस-पंचवीस धावा जमविल्यास संघाला ते फायदेशीर ठरु शकते. याचा अर्थ केवळ गोलंजाद हवा नसतो असे नाही. प्रत्येक सामन्यात सरासरी दोन बळी घेण्याची क्षमता असलेला गोलंदाज, अथवा जॉन्टी ऱ्होड्स सारखा अफलातून क्षेत्ररक्षक असेल तरीही प्रतिस्पर्ध्यावर दडपण येतेच. त्यामुळे असा खेळाडू संघाना हवाच असतो. तसेच खेळाडू संघ अडचणीत असताना कशी कामगिरी करतो, दडपणात तो कसा खेळ कररु शकतो, केवळ फटकेबाजीचा विचार करतो की, फटका मारण्यास योग्य असलेल्या चेंडूची खेळाडू वाट पाहतो, याचाही विचार त्याची खेळाची पद्धत ठरविण्यास उपयोगी ठरते. एखादा खेळाडू जर सलग ३० ते ४० धावा काढून बाद होत असेल, तर तो लवकर आपला संयम घालवून बाद होतो की काय याचाही विचार केला जातो. त्या नुसार खेळाडूच्या कमकुवत बाजूवर काम केले जाते, असे शर्मा म्हणाले.