शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

कसोटीची १४० वर्षे

By admin | Updated: March 16, 2017 01:20 IST

कसोटी क्रिकेटला आज १४० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आला होता.

कसोटी क्रिकेटला आज १४० वर्षे पूर्ण झाली. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १५ मार्च १८७७ रोजी आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात आला होता. आॅस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) झालेल्या या सामन्यात इंग्लंडला ४५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर इग्लंडने पुढील सामना जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली होती.भारताने १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. भारताने आतापर्यंत ५१० कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १३८ सामन्यांत विजय तर १५८ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. २१३ सामने अनिर्णित राहिले होते. एक सामना ‘टाय’ होता. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम इग्लंडच्या नावावर आहे. इग्लंडने ९८९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ३५१ सामने जिंकले असून २८९ सामन्यांत पराभव स्वीकारला आहे. इग्लंडने ३४३ सामने अनिर्णित सोडवले. आॅस्ट्रेलियाने ७९९ कसोटी सामने खेळले असून त्यांनी ३७७ सामने जिंकले आहेत. आॅस्ट्रेलियाने केवळ २१४ सामने गमावले आहेत. बांगलादेश हा सर्वात कमी कसोटी सामने खेळणारा संघ आहे. त्यांनी ९९ कसोटी सामने खेळले असून त्यात केवळ ८ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांनी ७६ सामने गमावले आहेत. बांगलादेशने १५ सामन्यांत बरोबरी साधली आहे. जगात एकूण १० संघ कसोटी सामने खेळत आहेत. ज्यामध्ये आॅस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. संकलन-सचिन कोरडे