शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

युवकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुकरण करावे, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: August 20, 2023 17:49 IST

अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. 

नवी मुंबई:  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मानवतावादी आणि क्रांतिकारी विचारांचे आजच्या युवा वर्गाने अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. 

महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक मातंग समाज महासंघ आणि उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  संदीप नाईक उपस्थित होते.  अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. कष्टकरी,श्रमिक, वंचितांना जगण्याचे बळ दिल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईच्या सामाजिक विकासात मातंग समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे मातंग समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम आग्रही राहिलेले आहेत. या समाजाच्या नेतृत्वाला नाईक यांनी नेहमीच सन्मानाचे स्थान दिले आहे. यापुढे सुद्धा मातंग समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. मातंग समाजाचे आजवर घनिष्ठ ऋणानुबंध राहिले आहेत. मातंग समाजामधील नेतृत्वाचा लोकनेते नाईक यांनी नेहमीच सन्मान केला आहे. यापुढे देखील मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी  सर्वोत्परी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही संदीप नाईक यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नामवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, फकीरा पॅंथरचे संस्थापक- अध्यक्ष ॲड.गुरु सूर्यवंशी तसेच मातंग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई