शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे अनुकरण करावे, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: August 20, 2023 17:49 IST

अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. 

नवी मुंबई:  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मानवतावादी आणि क्रांतिकारी विचारांचे आजच्या युवा वर्गाने अनुकरण करणे गरजेचे असल्याचे मत भाजपाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केले आहे. अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने युवा वर्गाने प्रयत्न करावेत,असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले. 

महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटक मातंग समाज महासंघ आणि उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  संदीप नाईक उपस्थित होते.  अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले. कष्टकरी,श्रमिक, वंचितांना जगण्याचे बळ दिल्याचे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. नवी मुंबईच्या सामाजिक विकासात मातंग समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक हे मातंग समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायम आग्रही राहिलेले आहेत. या समाजाच्या नेतृत्वाला नाईक यांनी नेहमीच सन्मानाचे स्थान दिले आहे. यापुढे सुद्धा मातंग समाजाचे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. मातंग समाजाचे आजवर घनिष्ठ ऋणानुबंध राहिले आहेत. मातंग समाजामधील नेतृत्वाचा लोकनेते नाईक यांनी नेहमीच सन्मान केला आहे. यापुढे देखील मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी  सर्वोत्परी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही संदीप नाईक यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास उमाकांत नामवाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप नामवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील, फकीरा पॅंथरचे संस्थापक- अध्यक्ष ॲड.गुरु सूर्यवंशी तसेच मातंग महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई