शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

युवा पिढी ही राष्ट्रीय संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:11 IST

आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे,

नवी मुंबई : आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.सिडको कर्मचारी संघटना आणि सिडको बी.सी. एम्प्लॉईज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको भवन येथे आंबेडकर जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपला देश आर्थिक विकास, पाणी नियोजन व बेरोजगारी यासारख्या समस्यांनी ग्रासला आहे. आदर्श लोकशाहीसाठी प्रत्येकाने पुनर्विचार करण्याची गरज आहे. या प्रक्रियेतूनच देशाचा विकास साधला जाईल, असे मत आंबेडकर यांनी यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार आचरणात आणणे महत्त्वाचे असल्याचे मत गगराणी यांनी आपल्या भाषणातून मांडले. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा, राजेंद्र चव्हाण, मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे.टी. पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)