शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात दहा रुपयांना मिळतोय मास्क, तरीही घेईनात..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 09:53 IST

ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. 

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल परिसरात कोरोना संसर्ग ओसरल्याने बिनधास्त झालेल्या नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कमी केल्याचे दिसून येते. त्यामुळे सॅनिटायझर आणि मास्कची विक्री काही प्रमाणात मंदावल्याचे औषध विक्रेत्याने सांगितले.  कोरोनाची लस घेतल्याले, आपण कोरोनामुक्त झालोय, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. मात्र  ओमायक्रॉन  कोरोना संसर्ग होत असल्याने नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. 

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना संख्या कमी झाल्यामुळे तसेच राज्यातील कोरोना संसर्ग ओसरल्यामुळे कोरोना नियमात शिथिलता देण्यात आली होती. त्यानुसार  प्रवास, कार्यक्रम, लग्न समारंभासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेले नागरिक बिनधास्त वावरताना दिसून येत आहेत. सद्य स्थितीत ओमायक्रॉन संसर्गाचे  रुग्ण वाढल्याने कोरोना  नियम कडक करण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात परदेश वारीतील  ६ ओमायक्रॉनबाधित आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यानुसार मास्कचा वापर, कार्यक्रमावर नजर ठेवण्यात येत आहे, तर पालिकेने ‘नो मास्क, नो एंट्री’ धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे न संपल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, वारंवार सॅनिटायझर लावणे, हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या गोष्टी गरजेच्या आहेत. मात्र नागरिकांकडून           याकडे दुर्लक्ष होत आहे.                       पालिकेकडून  कारवाई करण्यात येत असली, तरी नागरिकांचा निष्काळजीपणा समोर येत आहे.  

मास्क लावणे गरजेचे…प्रशासनाने पनवेल परिसरात मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली असली तरी, मास्क न घालता फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतरही संसर्ग होऊ नये याकरिता मास्क वापरणे गरजेचे आहे. कोराेनाच नव्हे, तर इतर कोणत्याही संसर्गजन्य आजाराला दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. याने कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.

मास्क, सॅनिटायझरच्या विक्रीत घट    पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान बहुतांश नागरिकांच्या हातात किंवा खिशात सातत्याने सॅनिटायझरची बाटली अथवा स्प्रे ठेवणाऱ्या नागरिकांनी सॅनिटायझर वापरणे आता कमी केले आहे.      मास्क आणि सॅनिटायझरच्या किमती कमी झाल्या आहेत. तरी नागरिक या  वस्तूंची खरेदी कमी करत असल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत विक्रीत घट झाल्याचे अनिल रूपकर या औषध विक्रत्याने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबई