शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

स्वस्त भाजी विक्री केंद्राची वर्षपूर्ती

By admin | Updated: December 25, 2015 02:35 IST

निवडणूका आल्या किंवा भाजीपाला महाग झाला तर शासन व राजकिय पदाधिकारी स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू करतात. परंतू एकही केंद्र नियमीतपणे सुरू रहात नाही.

नवी मुंबई : निवडणूका आल्या किंवा भाजीपाला महाग झाला तर शासन व राजकिय पदाधिकारी स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू करतात. परंतू एकही केंद्र नियमीतपणे सुरू रहात नाही. परंतू नेरूळमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर सुरू झालेले केंद्राला शुक्रवारी एक वर्ष होत आहे. गृहिणींसाठी दिलासा ठरलेल्या या केंद्राने वर्षपुर्तीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निधी देण्याचा संकल्प केला आहे. मुंबईत अनेकवेळा शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळत नाही व दुसरीकडे ग्राहकांना मात्र जादा दराने भाजीपाला विकत घ्यावा लागतो. मध्यस्थांची साखळी वाढत असल्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचेही नुकसान होत असते. बाजारभाव प्रचंड वाढले की शासन व एपीएमसीच्यावतीने स्वस्त भाजीपाला केंद्र सुरू केले जाते. राजकिय पदाधिकारीही स्वस्तभाजीपाला विक्री केंद्र उघडतात. परंतू एक महिन्यात केंद्र बंद केली जातात. पुन्हा ग्राहकांना जादा दराने भाजी घ्यावी लागते. नागरिकांना स्वस्त दरात भाजीपाला मिळवून देण्यासाठी नेरूळमधील प्रथमेश संस्थेचे प्रमुख व सामाजीक कार्यकर्ते महादेव पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेक्टर ६ मध्ये स्वस्त भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. २५ डिसेंबर २०१४ ला हा उपक्रम सुरू केला. प्रत्येक सोमवारी एपीएमसीमधून भाजी खरेदी केली जाते. वाहतूकिच्या खर्चाचा समावेश करून त्या भाजीची विक्री केली जात आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्त दरात भाजी मिळतेच परंतू परिसरातील इतर भाजी विक्रेत्यांनाही कमी दरामध्ये विक्री करावी लागत आहे. स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रातून प्रत्येक आठवड्याला ८०० ते १००० किलो मालाची विक्री केली जात आहे. वर्षभरामध्ये तब्बल ४५ टन भाजीची विक्री झाली आहे. नियमीत भाजीविक्रेत्यांपेक्षा जवळपास अर्ध्या किमतीमध्ये व कांदा, बटाटा जवळपास ४० टक्के स्वस्त दराने विकला जात आहे. शुक्रवारी या उपक्रमास वर्ष होत आहे. या निमीत्त केंद्र चालविणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थीक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हा निधी नामं फाऊंडेशन किंवा मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपुर्द केला जाणार आहे. वर्षभर शेतात राबून शेतकरी भाजीपाला पिकवितो व पुर्ण देशवासीयांना पुरवितो. तो शेतकरीच अडचणीत असताना कर्तव्य म्हणून मदत केली जाणार आहे. (प्रतिनिधी)