शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

साहित्यकाराने प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:29 IST

डॉ. दिलीप पांढरपट्टे : वाशीत पत्रकार दिनाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  महाराष्ट्राने अनेक मोठे साहित्यिक व कलाकार या देशाला दिले आहेत. त्यांचे साहित्य व कलाकृती आजही अजरामर आहेत. आजच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्याची हानी होत आहे. मराठी साहित्यांमध्ये लोकप्रियतेचा धोका आहे. यातून साहित्यकारांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. साहित्यकाराने कधीही प्रेक्षकांच्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये, नेहमी स्वत:ला स्वत:च दाद दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले. 

नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने व कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘एकविसाव्या शतकातील २१वे वर्ष: आव्हाने’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. तर महाराष्ट्राची वैचारिक परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्राची भूमी विचार देणारी आहे. महाराष्ट्र वैचारिक परंपरेचा पाया त्या काळी बाळशास्त्री जांभेकरांनी रचल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ. गणेश मुळे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती दिली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) गणेश मुळे उपस्थित होते.

लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी घटनेनुसार कार्य होण्याची गरज आहे. तसेच शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या बाबींवर अधिक लक्ष द्यायला हवे. वैज्ञानिक विचार व दृष्टिकोन वाढवितानाच शालेय शिक्षण अभ्यासक्रमात राज्यघटना हा विषय शिकवणेसुध्दा तितकेच गरजेचे असल्याचे मत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मांडले.