शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाच दिवसांतच मोडला संसार

By admin | Updated: May 13, 2017 01:24 IST

शीर व पाय नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह रबाळे एमआयडीसीमध्ये आढळून आला होता. या मयत महिलेच्या मानेवर गणपतीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शीर व पाय नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह रबाळे एमआयडीसीमध्ये आढळून आला होता. या मयत महिलेच्या मानेवर गणपतीच्या टॅटूवरून तिची ओळख पटली आहे. प्रियंका गुरव असे तिचे नाव असून घटनेच्या पाच दिवस अगोदरच तिचा प्रेमविवाह झालेला आहे.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्यामध्ये ही घटना घडली होती. महिलेची हत्या करून शीर व पाय वेगळे करून फक्त धड त्याठिकाणी टाकण्यात आले होते. यावेळी सदर मृत महिलेच्या मानेवर गणपतीचा टॅटू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याच टॅटूवरून तिची ओळख पटली आहे. प्रियंका सिद्धेश गुरव (२४) असे तिचे नाव असून ती वरळीची राहणारी आहे. ३० एप्रिलला तिचा सिद्धेश यांच्यासोबत प्रेमविवाह झाला आहे. लग्नापूर्वी ती दिवा गाव येथे मामाच्या घरी राहायची. लग्नानंतर ती सासरी गेली असता पाच दिवसातच ती घरातून बेपत्ता झाली होती. नोकरीच्या शोधात ती घराबाहेर गेली असता परत आलीच नाही असे तिच्या सासरच्यांचे म्हणणे आहे. यानुसार ती बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दोनच दिवसांत रबाळे एमआयडीसी हद्दीत एका महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहिती तिचा भाऊ गणेश भामरे यांना मिळाली. यावरून त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मानेवरील गणपतीच्या टॅटूमुळे तिची ओळख पटली. दोन महिन्यांपूर्वी प्रियंकाने मानेवर काढलेला टॅटू गणेशला दाखवलेला होता. यामुळे तिची ओळख पटवणे शक्य झाले. परंतु लग्नानंतर पाच दिवसातच नोकरीच्या शोधात घराबाहेर गेली कशी असा माहेरच्यांना प्रश्न पडला आहे. यामुळे तिच्या बेपत्ता होऊन हत्या होन्यामागे कोणाचातरी पूर्वनियोजित कट असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.प्रियंकाच्या लहानपणीच आई- वडिलांच्या निधनानंतर मामांनी त्यांचे संगोपन केले आहे. दोन वर्षांपासून तिचे व सिद्धेशचे एकमेकांवर प्रेम होते. सुरवातीला घरच्यांचा त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. मात्र तिच्या हट्टामुळे घरचे दोघांच्या लग्नाला तयार झाले होते. मात्र लग्नाच्या दोन दिवस अगोदर तिने काही क्षणासाठी लग्नाला नकार देत भीती व्यक्त केली होती असेही भाऊ गणेश भामरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.