शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

कामगारांचे ‘भविष्य’ टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 02:23 IST

महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेक कामगारांच्या नावावर पैसे नियमित भरण्यात आलेले नाहीत

नवी मुंबई : महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेक कामगारांच्या नावावर पैसे नियमित भरण्यात आलेले नाहीत. हयात असलेल्या कामगारांचे भविष्य अंधारात असताना ज्यांचे निधन झाले आहे, अशा कामगारांच्या नावावर तीन वर्षे पैसे भरल्याचे उघडकीस आले आहे.महापालिकेला स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या साफसफाई कामगारांची ठेकेदाराकडून पिळवणूक होऊ लागली आहे. कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेवर संबंधित विभागाकडे जमा केली जात नाही. अनेक कामगारांची पी.एफ.ची रक्कम भरलेलीच नाही तर काहींची कमी भरली आहे. काही कामगारांची रक्कम दोन ते तीन वर्षांनंतर भरली आहे. भविष्यनिर्वाह निधीमध्ये घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने घनकचरा विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांना घेराव घातला. ज्या कामगारांचे पैसे भरले नाहीत त्यांची माहिती दिली. शिवसैनिकांनी व कामगारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. एका महिला कर्मचाऱ्याने तीन ठेकेदारांकडे काम केले. निवृत्ती घेतल्यानंतर तिला भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा पगार बँकेत जमा न करता रोख स्वरूपात दिला जात असून त्यांचाही पी. एफ. भरला जात नाही. नेरूळ शिवाजीनगरमध्ये काम करणाऱ्या विजय राठोड या कामगाराचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर दोन महिन्यांमध्ये त्या जागेवर त्याची पत्नी रुजू झाली आहे. मृत्यूनंतरही तीन वर्षे विजय यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु काम करत असलेल्या त्याच्या पत्नीची रक्कम मात्र भरली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. याबद्दल विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भविष्यनिर्वाह निधीमधील घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या कामगारांच्या खात्यात एक लाखापेक्षा जास्त रक्कम असणे अपेक्षित आहे, त्यांच्या नावावर २५ ते ३० हजार रुपये जमा असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. ज्या ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घोटाळा झाला आहे, त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक शिवराम पाटील, संजू वाडे, सोमनाथ वास्कर, सरोज पाटील, भारती कोळी, ऋचा पाटील, सुवर्णा सपकाळ, दीपाली सकपाळ, रामदास पवळे, ममित चौगुले, चेतन नाईक,रतन मांडवे, विशाल ससाणे,जगदीश गवते, महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.