शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जीटीआयमध्ये काम बंद

By admin | Updated: August 5, 2015 00:13 IST

जेएनपीटी बंदरातील ‘गेटवे टर्मिनल आॅफ इंडिया’च्या (जीटीआय) कामगारांचे आंदोलन मंगळवारपासून आणखी चिघळले. संतप्त कामगारांनी संपूर्ण जीटीआय बंदराचे काम बंद केले.

चिरनेर : जेएनपीटी बंदरातील ‘गेटवे टर्मिनल आॅफ इंडिया’च्या (जीटीआय) कामगारांचे आंदोलन मंगळवारपासून आणखी चिघळले. संतप्त कामगारांनी संपूर्ण जीटीआय बंदराचे काम बंद केले. मागील २४ जुलैपासून या नोकरीत कायमस्वरूपी करण्यात यावे, या मगाणीसाठी कामगारांचे करळफाटा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी जेएनपीटीचे संचालक नीरज बन्सल यांनी मध्यस्थी करून जीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी आर. गायतोंडे, कंपनी व्यवस्थापन आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील आणि समितीचे निमंत्रक अतुल पाटील यांच्यात चर्चा घडवून आणली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारपासून कामगारांनी काम बंद पाडले. जेएनपीटी बंदरातील हे टर्मिनल जीटीआय या खासगी बंदराकडे चालवायला दिले आहे. जीटीआयने या बंदरातील कंटेनर हाताळणीचे काम महेश एंटरप्रायझेस या कंपनीकडे दिले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून १९४ कामगार हे कंटेनर हाताळणीचे काम करत आहेत. मात्र गेल्या ९ वर्षांपासून या कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसून त्यांना नोकरीमध्ये कायम देखील केले जात नाही.