शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वाशीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By कमलाकर कांबळे | Updated: March 14, 2023 15:01 IST

वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सुमारे ५० शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

नवी मुंबई: विविध मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हे आंदोलन केले जात आहे. वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सुमारे ५० शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.

हणमंतराव लोंढे, महादेव पाटील, शिवाजी म्हात्रे, संजीव पाटील, नंदलाल आहेर, किर्ती भंडारकर, विकास कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मान्यता द्यावी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. 

विशेष म्हणजे २० फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू केले होते. परंतु, राज्य शासन आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त समिती दरम्यान झालेल्या चर्चेनंतर हे अंदोलन १० मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने मंगळवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबईत कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात भाग घेतला आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवले जाणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई