शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुढील दोन महिन्यात पनवेल मधील मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे काम मार्गी;हरित ऊर्जेद्वारे दोन हजार मेगावॅट वीजेची उपलब्धता

By वैभव गायकर | Updated: May 12, 2024 14:30 IST

पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार  मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.

वैभव गायकर

पनवेल : पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार  मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी वीज ही हरित ऊर्जा प्रकाराची असल्याने ग्राहकांच्या खिशावरचा भार काही प्रमाणात का होईना, हलका होणार आहे.दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे.

गुजरात राज्यातील कच्छमधल्या दोदरा येथे सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी वीज मुंबई महानगर प्रदेशाकरिता आणण्याचा उपक्रम ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिन्यांचा  कालावधी लागणार आहे.सध्या कार्यान्वित असलेल्या अति उच्च दाबाच्या वीजवाहिन्या वाढलेली विजेची मागणी लक्षात घेता वीज पारेषण करण्यासाठी पुरेशा सक्षम नाहीत. साधारणतः पाच ते सहा दशकांपूर्वी उभारलेले हे वीजवाहिन्यांचे जाळे. दिवसेंदिवस वाढत जाणारी विजेची मागणी त्यामुळे अतिरिक्त वीज आणण्यासाठी या वीजवाहिन्या प्रभावी ठरत नाहीत. यासाठी अति उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार करणे, ही आता वीजकंपन्यांपुढे मोठी गरज बनली आहे.

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून अति उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे.पनवेल मध्ये प्रकल्पाला होणार विरोध पाहता भूसंपादनाच्या बाबतीत स्थानिक जमीनधारकांना समाधानकारक मोबदला देण्यासाठी जे शक्य होईल, ते सर्व करण्याचा मुंबई ऊर्जा प्रकल्पाची भूमिका आहे.एकीकडे वाढलेला विजेचा वापर तर दुसरीकडे अधून मधून खंडित होणारा विद्युतपुरवठा यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच वीजवितरण नियोजनाच्या दृष्टीने पूर्वनियोजित वीज बंद है देखील नागरिकांची नवी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे मुंबई ऊर्जा मार्ग व त्यासारख्या आणखीन प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज पारेषण क्षमता निर्माण न केल्यास भविष्यात विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे.मुंबई महानगर,नवी मुंबई तसेच नव्याने होऊ घातलेल्या महामुंबईची विजेची मागणी लक्षात घेता हि सर्व गरज या प्रकल्पामुळे भरून निघणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश झपाट्‌याने विकसित होत आहे. सुनियोजित विकासाची सगळ्यात पहिली गरज म्हणजे अखंडित वीजपुरवठा, ज्याप्रमाणात या प्रदेशाचा विकास होतो आहे. ते पाहता येत्या काळात अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. सध्याच्या पारेषण प्रणालीमध्ये नव्या अति उच्च दाब वाहिन्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज वाहिन्या उभारुन भविष्यात विजेचा हा तुटवडा भरून काढणे सोपे होणार आहे.

-डॉ. संजीव कुमार(अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)