शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलावरून आत्महत्यांना बसणार आळा, सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:17 IST

Vashi : मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांना अखेर आळा बसणार आहे. पुलाला सुरक्षा जाळी नसल्याने नैराश्यात असलेल्या व्यक्तींना तेथून उडी मारण्याची संधी मिळत होती. त्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उद्भवत असलेल्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवला होता.मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. प्रतिवर्षी साधारण ५० हून अधिक व्यक्ती या खाडीपुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असतात. पुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची कमी असल्याने त्यांना पुलावरून उडी मारणे सहज शक्य होते. नुकतीच एक महिला खाडीत निर्माल्य टाकत असताना तोल जाऊन पडली होती. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची वाढवावी अथवा जाळी उभारण्याची मागणी वाहतूक व शहर पोलिसांकडून सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने अनेकांनी वेळोवेळी पाहणी दौरेदेखील केले होते. खाडी पुलावरून उडी मारणाऱ्या व्यक्तींच्या बचावासाठी पोलीस, अग्निशमन तसेच मच्छीमार बांधव यांना धोका पत्करावा लागत होता. पर्यायी पुलालगत वाशी पोलिसांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात आली आहे. वेळप्रसंगी त्यांच्या मदतीला मच्छीमार बांधव धावून येतात. यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात पुलावरून उडी मरणाऱ्यांपैकी बहुतांश व्यक्तींचे प्राण वाचवण्यात आले आहेत. परंतु पोलिसांकडून मागणी होऊनदेखील पुलावर सुरक्षा जाळी बसवली जात नसल्याने आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. त्याबाबत लोकमतने अनेकदा वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर खाडीपुलाभोवती सुरक्षा जाळी बसण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. त्यासाठी चाचणीकरिता जाळी बसवण्यात आली आहे. लवकरच पुलाच्या दोन्ही बाजूंचा मोकळा भाग या जाळीने बंदिस्त केला जाणार आहे. त्यामुळे नैराश्यात आत्महत्येच्या प्रयत्नात खाडीपुलावरून उडी मारणाऱ्यांना आळा बसणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई