शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून रखडले ऐरोली नाट्यगृहाचे काम

By admin | Updated: February 23, 2017 06:36 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह

नामदेव मोरे / नवी मुंबईवाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने २०१३ मध्ये घेतला. २०१४ मध्ये कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परंतु राजकीय वाद व प्रशासकीय उदासीनता यामुळे काम ठप्प झाले असून ऐरोलीकरांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील पूर्ण न झालेल्या प्रकल्पामध्ये ऐरोली मधील नाट्यगृहाचा समावेश आहे. वाशीमध्ये मनपाचे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. परंतु ऐरोली परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण दूर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना नाटक व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येत नाहीत. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नवीन नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले. १३०४६ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाच्या भूखंडावर १६ मीटर उंचीचे व ४ मजली नाट्यगृह बांधण्यात येणार होते. यामध्ये तळमजल्यावर तिकीटगृह, रंगीत तालीम कक्ष, पहिल्या मजल्यावर मेकअप रूम, दुसऱ्या मजल्यावर ग्रीनरूम, प्रशासकीय दालन, रंगमंचासह बहुउद्देशीय सभागृह, तिसऱ्या मजल्यावर अधिकारी कक्ष, २ अतिथीगृह, अशी व्यवस्था करण्यात येणार होती. तळघरामध्ये ९४ चारचाकी व ४१ दुचाकी वाहने उभी करण्याचे नियोजन केले होते. महापालिकेने २१ आॅगस्ट २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात पायासाठी केलेल्या खोदकामाव्यतिरिक्त काहीही काम झालेले नाही. नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पाठपुरावा केला होता. ते राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. पण त्यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नाट्यगृहाचे काम ठप्प झाले. यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे काम थांबल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनामधील राजकीय हस्तक्षेप मोडीत काढला. प्रशासनाच्या कामामध्ये कोणत्याही पक्षाचे नेते हस्तक्षेप करत नाहीत. असे असतानाही ८ महिन्यात नाट्यगृहाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. च्ऐरोलीमध्ये नाट्यगृहाचे बांधकाम करण्याचा मूळ प्रस्ताव ५४ कोटी रूपयांचा आहे. महापालिकेने बांधकामासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. डिसेंबर २०१५ पर्यंत जवळपास ३८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पण प्रत्यक्षात काम काहीही झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम थांबले असून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेला हे काम पूर्णत्वास न्यायचे नव्हते तर ते सुरू का केले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.