शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

दोन वर्षांपासून रखडले ऐरोली नाट्यगृहाचे काम

By admin | Updated: February 23, 2017 06:36 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह

नामदेव मोरे / नवी मुंबईवाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने २०१३ मध्ये घेतला. २०१४ मध्ये कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परंतु राजकीय वाद व प्रशासकीय उदासीनता यामुळे काम ठप्प झाले असून ऐरोलीकरांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील पूर्ण न झालेल्या प्रकल्पामध्ये ऐरोली मधील नाट्यगृहाचा समावेश आहे. वाशीमध्ये मनपाचे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. परंतु ऐरोली परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण दूर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना नाटक व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येत नाहीत. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नवीन नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले. १३०४६ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाच्या भूखंडावर १६ मीटर उंचीचे व ४ मजली नाट्यगृह बांधण्यात येणार होते. यामध्ये तळमजल्यावर तिकीटगृह, रंगीत तालीम कक्ष, पहिल्या मजल्यावर मेकअप रूम, दुसऱ्या मजल्यावर ग्रीनरूम, प्रशासकीय दालन, रंगमंचासह बहुउद्देशीय सभागृह, तिसऱ्या मजल्यावर अधिकारी कक्ष, २ अतिथीगृह, अशी व्यवस्था करण्यात येणार होती. तळघरामध्ये ९४ चारचाकी व ४१ दुचाकी वाहने उभी करण्याचे नियोजन केले होते. महापालिकेने २१ आॅगस्ट २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात पायासाठी केलेल्या खोदकामाव्यतिरिक्त काहीही काम झालेले नाही. नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पाठपुरावा केला होता. ते राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. पण त्यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नाट्यगृहाचे काम ठप्प झाले. यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे काम थांबल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनामधील राजकीय हस्तक्षेप मोडीत काढला. प्रशासनाच्या कामामध्ये कोणत्याही पक्षाचे नेते हस्तक्षेप करत नाहीत. असे असतानाही ८ महिन्यात नाट्यगृहाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. च्ऐरोलीमध्ये नाट्यगृहाचे बांधकाम करण्याचा मूळ प्रस्ताव ५४ कोटी रूपयांचा आहे. महापालिकेने बांधकामासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. डिसेंबर २०१५ पर्यंत जवळपास ३८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पण प्रत्यक्षात काम काहीही झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम थांबले असून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेला हे काम पूर्णत्वास न्यायचे नव्हते तर ते सुरू का केले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.