शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
3
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
4
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
5
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
6
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
7
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
10
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
11
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
12
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
13
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
14
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
15
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
16
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
17
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
18
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
19
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
20
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

दोन वर्षांपासून रखडले ऐरोली नाट्यगृहाचे काम

By admin | Updated: February 23, 2017 06:36 IST

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह

नामदेव मोरे / नवी मुंबईवाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने २०१३ मध्ये घेतला. २०१४ मध्ये कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परंतु राजकीय वाद व प्रशासकीय उदासीनता यामुळे काम ठप्प झाले असून ऐरोलीकरांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील पूर्ण न झालेल्या प्रकल्पामध्ये ऐरोली मधील नाट्यगृहाचा समावेश आहे. वाशीमध्ये मनपाचे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. परंतु ऐरोली परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण दूर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना नाटक व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येत नाहीत. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नवीन नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले. १३०४६ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाच्या भूखंडावर १६ मीटर उंचीचे व ४ मजली नाट्यगृह बांधण्यात येणार होते. यामध्ये तळमजल्यावर तिकीटगृह, रंगीत तालीम कक्ष, पहिल्या मजल्यावर मेकअप रूम, दुसऱ्या मजल्यावर ग्रीनरूम, प्रशासकीय दालन, रंगमंचासह बहुउद्देशीय सभागृह, तिसऱ्या मजल्यावर अधिकारी कक्ष, २ अतिथीगृह, अशी व्यवस्था करण्यात येणार होती. तळघरामध्ये ९४ चारचाकी व ४१ दुचाकी वाहने उभी करण्याचे नियोजन केले होते. महापालिकेने २१ आॅगस्ट २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात पायासाठी केलेल्या खोदकामाव्यतिरिक्त काहीही काम झालेले नाही. नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पाठपुरावा केला होता. ते राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. पण त्यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नाट्यगृहाचे काम ठप्प झाले. यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे काम थांबल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनामधील राजकीय हस्तक्षेप मोडीत काढला. प्रशासनाच्या कामामध्ये कोणत्याही पक्षाचे नेते हस्तक्षेप करत नाहीत. असे असतानाही ८ महिन्यात नाट्यगृहाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. च्ऐरोलीमध्ये नाट्यगृहाचे बांधकाम करण्याचा मूळ प्रस्ताव ५४ कोटी रूपयांचा आहे. महापालिकेने बांधकामासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. डिसेंबर २०१५ पर्यंत जवळपास ३८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पण प्रत्यक्षात काम काहीही झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम थांबले असून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेला हे काम पूर्णत्वास न्यायचे नव्हते तर ते सुरू का केले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.