शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विमानतळाचे काम प्रगतिपथावर, डिसेंबर २०१९मध्येच होणार पहिला टप्पा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:20 IST

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुनर्वसन प्रक्रियेत अद्यापि काही अडथळे आहेत; परंतु येत्या काळात तेही दूर केले जातील. एकूणच विमानतळाचा पहिला टप्पा निर्धारित वेळेतच म्हणजेच, डिसेंबर २०१९मध्ये पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रयत्न असल्याची माहिती सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी दिली.प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ११६० हेक्टर जागेवर सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च करून ग्रीड फिल्ड पद्धतीने हे विमानतळ उभारले जाणार आहे. या विमानतळाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. २०१९पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रकल्पपूर्व सुमारे दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात जमिनीचे सपाटीकरण, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, उलवे नदीचे पात्र बदलणे व विमानतळाच्या मार्गात मुख्य अडथळा ठरणाºया उलवे टेकडीची उंची कमी करणे, या कामांचा समावेश आहे. सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी प्रसारमाध्यमांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बेलापूर येथील सिडको गेस्ट हाउसमध्ये पत्रकारांसमोर या संपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे. एकूण ३००० कुटंबांचे वडघर आणि वहाळ येथे विकसित भूखंड देऊन पुनर्वसन केले जाणार आहे. आतापर्यंत १९७७ भूखंड विकसित करण्यात आले असून, उर्वरित फेब्रुवारी २०१८पर्यंत विकसित केले जातील. एकूण प्रकल्पबाधितांपैकी आतापर्यंत २५० कुटुंबांनी स्थलांतरण करून विकसित भूखंडांचा ताबा घेतला आहे. तर ७५० प्रकल्पबाधितांनी भूखंडांचे करारनामे केल्याची माहिती प्राजक्ता लवांगरे-वर्मा यांनी पत्रकारांना दिली. प्रकल्पग्रस्तांच्या एक-दोन मागण्या प्रलंबित आहेत. राज्य सरकारने आपल्या स्तरावर निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे ते म्हणाले. विमानतळ उभारणीचे काम जीव्हीके कंपनीला देण्यात आले आहे. डिसेंबर २०१८पर्यंत प्रकल्पपूर्व कामे पूर्ण करून नियोजित विमानतळाची जागा कंपनीच्या ताब्यात दिली जाईल. डिसेंबर २०१९मध्ये विमानाचे पहिले टेकआॅफ होईल, या दृष्टीने सिडकोचे प्रयत्न असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, विमानतळ प्रकल्पाचे मुख्य अभियंता आर. बी. धायटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ