शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

परिचितांकडूनच महिलांचा विश्वास‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:13 IST

नवी मुंबई, पनवेलमधील परिस्थिती : दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १०५० घटना

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमध्ये महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १,०५० घटना घडल्या आहेत. त्यात बलात्कार, हुंडाबळी यासह लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश गुन्हे हे संबंधित महिला व मुलीच्या परिचयाच्या व्यक्तींकडूनच घडले आहेत. 

गुजरात येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नदीत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतदेखील अशाच त्रासाला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याचे किंवा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सासरच्या जाचासह समाजातील इतर घटकांकडूनदेखील महिलांवर होणारे अत्याचार तितकेच गंभीर आहेत. मागील दोन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महिला अत्याचाराच्या १ हजार ५० घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४३८ गुन्ह्यांची नोंद मागील वर्षभरात झाली आहे. त्यात विनयभंग व बलात्काराच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. या वेळी अत्याचार करणारी व्यक्ती ही महिलेच्या परिचयातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. यावरून संबंधितांनी नियोजनबद्धरीत्या महिलेला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. बलात्काराच्या १२५ घटनांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ४५ घटना घडल्या आहेत. तर ओळखीच्या व्यक्तींकडून ५८ घटना घडलेल्या असून उर्वरित २२ घटनांमध्ये गुन्हेगार व पीडिता यांची ओळख नसल्याचे समोर आले आहे. विवाहितांवरील अत्याचारांत सासरच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे वेगवेगळ्या तक्रारींवरून पुढे आले आहे. पती - पत्नीमधील वादातून किंवा सासरच्या जाचाविरोधात महिला साहाय्यता कक्षाकडे वर्षभरात ६३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १५१ दाम्पत्यांचा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काडीमोड टाळला आहे. मात्र, उर्वरित ४८२ दाम्पत्ये एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यापैकी बहुतांश तक्रारी ह्या पत्नीवर अविश्वास किंवा सासरच्यांकडून होत असलेल्या छळाबाबत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीतदेखील महिलांच्या मनात घुसमट असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर अनेक महिला हा होणारा अत्याचार सहन करत संसाराशी तडजोड करीत असल्याचेही दिसून येत आहे. 

बालवयातला प्रेमभंगतारुण्यात पाय ठेवण्यापूर्वीच अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. मागील वर्षभरात अशा ३१ मुलींची राज्याबाहेरून सुटका करण्यात आली आहे. अशा मुलींना श्रीमंतीची किंवा सुखी संसाराची भुरळ घातली जाते.  प्रत्यक्षात मात्र पळवून नेल्यानंतर सातत्याने तिला शारीरिक व मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. 

संसारात समजूतदारपणा नाही nपती - पत्नीमधील वादात अनेकदा पती किंवा सासरच्यांकडून काडीमोड करण्याचा निर्णय घेतला जातो. यामध्ये सर्वाधिक महिला भरडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा काडीमोड टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिसांकडून होत असतो. nमात्र गतवर्षी महिला साहाय्यता कक्षाकडे दाखल झालेल्या एकूण ६३३ तक्रारींपैकी ४८२ तक्रारदार विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या प्रकरणांमधून  महिलांवर अन्यायच होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई