शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

परिचितांकडूनच महिलांचा विश्वास‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:13 IST

नवी मुंबई, पनवेलमधील परिस्थिती : दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १०५० घटना

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमध्ये महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १,०५० घटना घडल्या आहेत. त्यात बलात्कार, हुंडाबळी यासह लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश गुन्हे हे संबंधित महिला व मुलीच्या परिचयाच्या व्यक्तींकडूनच घडले आहेत. 

गुजरात येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नदीत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतदेखील अशाच त्रासाला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याचे किंवा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सासरच्या जाचासह समाजातील इतर घटकांकडूनदेखील महिलांवर होणारे अत्याचार तितकेच गंभीर आहेत. मागील दोन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महिला अत्याचाराच्या १ हजार ५० घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४३८ गुन्ह्यांची नोंद मागील वर्षभरात झाली आहे. त्यात विनयभंग व बलात्काराच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. या वेळी अत्याचार करणारी व्यक्ती ही महिलेच्या परिचयातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. यावरून संबंधितांनी नियोजनबद्धरीत्या महिलेला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. बलात्काराच्या १२५ घटनांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ४५ घटना घडल्या आहेत. तर ओळखीच्या व्यक्तींकडून ५८ घटना घडलेल्या असून उर्वरित २२ घटनांमध्ये गुन्हेगार व पीडिता यांची ओळख नसल्याचे समोर आले आहे. विवाहितांवरील अत्याचारांत सासरच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे वेगवेगळ्या तक्रारींवरून पुढे आले आहे. पती - पत्नीमधील वादातून किंवा सासरच्या जाचाविरोधात महिला साहाय्यता कक्षाकडे वर्षभरात ६३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १५१ दाम्पत्यांचा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काडीमोड टाळला आहे. मात्र, उर्वरित ४८२ दाम्पत्ये एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यापैकी बहुतांश तक्रारी ह्या पत्नीवर अविश्वास किंवा सासरच्यांकडून होत असलेल्या छळाबाबत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीतदेखील महिलांच्या मनात घुसमट असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर अनेक महिला हा होणारा अत्याचार सहन करत संसाराशी तडजोड करीत असल्याचेही दिसून येत आहे. 

बालवयातला प्रेमभंगतारुण्यात पाय ठेवण्यापूर्वीच अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. मागील वर्षभरात अशा ३१ मुलींची राज्याबाहेरून सुटका करण्यात आली आहे. अशा मुलींना श्रीमंतीची किंवा सुखी संसाराची भुरळ घातली जाते.  प्रत्यक्षात मात्र पळवून नेल्यानंतर सातत्याने तिला शारीरिक व मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. 

संसारात समजूतदारपणा नाही nपती - पत्नीमधील वादात अनेकदा पती किंवा सासरच्यांकडून काडीमोड करण्याचा निर्णय घेतला जातो. यामध्ये सर्वाधिक महिला भरडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा काडीमोड टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिसांकडून होत असतो. nमात्र गतवर्षी महिला साहाय्यता कक्षाकडे दाखल झालेल्या एकूण ६३३ तक्रारींपैकी ४८२ तक्रारदार विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या प्रकरणांमधून  महिलांवर अन्यायच होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई