शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

स्मार्ट शहरातही महिला असुरक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 02:12 IST

सुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे

नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या ७६२ घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. १२ वर्षांत गुन्ह्यांमध्ये सहा पट वाढ झाली असून ७० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीनेच गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सण, उत्सवांनाही दागिने घालण्याची भीती वाटू लागली आहे. रोज जवळपास दोन ठिकाणी घरफोडी होत असून बहुतांश ठिकाणी दागिने चोरीला जात असल्याने त्याचा सर्वाधिक धक्का महिलांनाच बसत आहेत. यामुळे नवी मुंबईमध्येही महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होवू लागली आहे. पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १२ वर्षांत सहा पट वाढल्या आहेत. २००४ मध्ये पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे १७ व विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये बलात्काराच्या १०४ व विनयभंगाच्या २०२ घटनांची नोंद झाली आहे. २०१२ पर्यंत महिलांवरील अत्याचाराच्या महिन्याला एक किंवा दोन तक्रारी दाखल होत होत्या. अनेक वेळा महिलांवर अत्याचार होवूनही समाजात बदनामी होवू नये यासाठी गुन्हे दाखल केले जात नाहीत. विनयभंगाच्याही अनेक तक्रारी दाखल होत नव्हत्या. परंतु दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर पीडित महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येवू लागल्या आहेत. पोलीसही महिलांविषयी गुन्हे तत्काळ नोंदवून तपास सुरू करत आहेत. २०१२ मध्ये अतिप्रसंगाचे ३५ गुन्हे दाखल होते. २०१३ मध्ये ही संख्या ६८ झाली. गतवर्षी दाखल गुन्ह्यांची संख्या १०४ वर गेली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनीही वार्षिक आढाव्याची माहिती देताना सांगितले की, महिलांवर अतिप्रसंग व विनयभंगाच्या ७० टक्के घटनांमध्ये परिचित व्यक्तीच आरोपी असल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये गत १२ वर्षामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली होती. २००५ मध्ये नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला होता. यानंतर २००७ मध्ये पारसिक हिल टेकडीवर फिनलँड देशातील महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. २०१३ मध्ये कोपरीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केल्याच्या घटनेचा राज्यभर निषेध झाला होता. यामधील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवून दीड वर्षात फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व घटनांमुळे नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उघड्यावरील मद्यपान थांबवावेशहरामध्ये बियर शॉपच्या बाहेर उभे राहून बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मद्यविक्रीचे दुकान आहे. दुकानासमोर उभे राहून मद्यपान सुरू असते. सानपाडा व इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. टपोरी व गुंडप्रवृत्तीचे तरूण मद्यपान करून महिलांची छेडछाड काढत असल्याच्या घटना होत असून उघड्यावरील मद्यपान थांबविण्याची मागणी केली जात आहे.