शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

स्मार्ट शहरातही महिला असुरक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 02:12 IST

सुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे

नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या ७६२ घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. १२ वर्षांत गुन्ह्यांमध्ये सहा पट वाढ झाली असून ७० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीनेच गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सण, उत्सवांनाही दागिने घालण्याची भीती वाटू लागली आहे. रोज जवळपास दोन ठिकाणी घरफोडी होत असून बहुतांश ठिकाणी दागिने चोरीला जात असल्याने त्याचा सर्वाधिक धक्का महिलांनाच बसत आहेत. यामुळे नवी मुंबईमध्येही महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होवू लागली आहे. पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १२ वर्षांत सहा पट वाढल्या आहेत. २००४ मध्ये पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे १७ व विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये बलात्काराच्या १०४ व विनयभंगाच्या २०२ घटनांची नोंद झाली आहे. २०१२ पर्यंत महिलांवरील अत्याचाराच्या महिन्याला एक किंवा दोन तक्रारी दाखल होत होत्या. अनेक वेळा महिलांवर अत्याचार होवूनही समाजात बदनामी होवू नये यासाठी गुन्हे दाखल केले जात नाहीत. विनयभंगाच्याही अनेक तक्रारी दाखल होत नव्हत्या. परंतु दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर पीडित महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येवू लागल्या आहेत. पोलीसही महिलांविषयी गुन्हे तत्काळ नोंदवून तपास सुरू करत आहेत. २०१२ मध्ये अतिप्रसंगाचे ३५ गुन्हे दाखल होते. २०१३ मध्ये ही संख्या ६८ झाली. गतवर्षी दाखल गुन्ह्यांची संख्या १०४ वर गेली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनीही वार्षिक आढाव्याची माहिती देताना सांगितले की, महिलांवर अतिप्रसंग व विनयभंगाच्या ७० टक्के घटनांमध्ये परिचित व्यक्तीच आरोपी असल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये गत १२ वर्षामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली होती. २००५ मध्ये नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला होता. यानंतर २००७ मध्ये पारसिक हिल टेकडीवर फिनलँड देशातील महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. २०१३ मध्ये कोपरीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केल्याच्या घटनेचा राज्यभर निषेध झाला होता. यामधील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवून दीड वर्षात फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व घटनांमुळे नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उघड्यावरील मद्यपान थांबवावेशहरामध्ये बियर शॉपच्या बाहेर उभे राहून बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मद्यविक्रीचे दुकान आहे. दुकानासमोर उभे राहून मद्यपान सुरू असते. सानपाडा व इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. टपोरी व गुंडप्रवृत्तीचे तरूण मद्यपान करून महिलांची छेडछाड काढत असल्याच्या घटना होत असून उघड्यावरील मद्यपान थांबविण्याची मागणी केली जात आहे.