शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

स्मार्ट शहरातही महिला असुरक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 02:12 IST

सुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे

नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या ७६२ घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. १२ वर्षांत गुन्ह्यांमध्ये सहा पट वाढ झाली असून ७० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीनेच गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सण, उत्सवांनाही दागिने घालण्याची भीती वाटू लागली आहे. रोज जवळपास दोन ठिकाणी घरफोडी होत असून बहुतांश ठिकाणी दागिने चोरीला जात असल्याने त्याचा सर्वाधिक धक्का महिलांनाच बसत आहेत. यामुळे नवी मुंबईमध्येही महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होवू लागली आहे. पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १२ वर्षांत सहा पट वाढल्या आहेत. २००४ मध्ये पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे १७ व विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये बलात्काराच्या १०४ व विनयभंगाच्या २०२ घटनांची नोंद झाली आहे. २०१२ पर्यंत महिलांवरील अत्याचाराच्या महिन्याला एक किंवा दोन तक्रारी दाखल होत होत्या. अनेक वेळा महिलांवर अत्याचार होवूनही समाजात बदनामी होवू नये यासाठी गुन्हे दाखल केले जात नाहीत. विनयभंगाच्याही अनेक तक्रारी दाखल होत नव्हत्या. परंतु दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर पीडित महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येवू लागल्या आहेत. पोलीसही महिलांविषयी गुन्हे तत्काळ नोंदवून तपास सुरू करत आहेत. २०१२ मध्ये अतिप्रसंगाचे ३५ गुन्हे दाखल होते. २०१३ मध्ये ही संख्या ६८ झाली. गतवर्षी दाखल गुन्ह्यांची संख्या १०४ वर गेली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनीही वार्षिक आढाव्याची माहिती देताना सांगितले की, महिलांवर अतिप्रसंग व विनयभंगाच्या ७० टक्के घटनांमध्ये परिचित व्यक्तीच आरोपी असल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये गत १२ वर्षामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली होती. २००५ मध्ये नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला होता. यानंतर २००७ मध्ये पारसिक हिल टेकडीवर फिनलँड देशातील महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. २०१३ मध्ये कोपरीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केल्याच्या घटनेचा राज्यभर निषेध झाला होता. यामधील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवून दीड वर्षात फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व घटनांमुळे नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उघड्यावरील मद्यपान थांबवावेशहरामध्ये बियर शॉपच्या बाहेर उभे राहून बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मद्यविक्रीचे दुकान आहे. दुकानासमोर उभे राहून मद्यपान सुरू असते. सानपाडा व इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. टपोरी व गुंडप्रवृत्तीचे तरूण मद्यपान करून महिलांची छेडछाड काढत असल्याच्या घटना होत असून उघड्यावरील मद्यपान थांबविण्याची मागणी केली जात आहे.