शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहरातही महिला असुरक्षितच

By admin | Updated: January 11, 2016 02:12 IST

सुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे

नामदेव मोरे,  नवी मुंबईसुनियोजित शहर म्हणून लौकिक असणाऱ्या पनवेलसह नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षितच असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००४ पासून ४६३ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून विनयभंगाच्या ७६२ घटनांची विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. १२ वर्षांत गुन्ह्यांमध्ये सहा पट वाढ झाली असून ७० टक्के घटनांमध्ये ओळखीच्या व्यक्तीनेच गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सण, उत्सवांनाही दागिने घालण्याची भीती वाटू लागली आहे. रोज जवळपास दोन ठिकाणी घरफोडी होत असून बहुतांश ठिकाणी दागिने चोरीला जात असल्याने त्याचा सर्वाधिक धक्का महिलांनाच बसत आहेत. यामुळे नवी मुंबईमध्येही महिला सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होवू लागली आहे. पोलिसांकडील आकडेवारी पाहिल्यानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना १२ वर्षांत सहा पट वाढल्या आहेत. २००४ मध्ये पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे १७ व विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये बलात्काराच्या १०४ व विनयभंगाच्या २०२ घटनांची नोंद झाली आहे. २०१२ पर्यंत महिलांवरील अत्याचाराच्या महिन्याला एक किंवा दोन तक्रारी दाखल होत होत्या. अनेक वेळा महिलांवर अत्याचार होवूनही समाजात बदनामी होवू नये यासाठी गुन्हे दाखल केले जात नाहीत. विनयभंगाच्याही अनेक तक्रारी दाखल होत नव्हत्या. परंतु दिल्लीमधील निर्भया प्रकरणानंतर पीडित महिला तक्रारी करण्यासाठी पुढे येवू लागल्या आहेत. पोलीसही महिलांविषयी गुन्हे तत्काळ नोंदवून तपास सुरू करत आहेत. २०१२ मध्ये अतिप्रसंगाचे ३५ गुन्हे दाखल होते. २०१३ मध्ये ही संख्या ६८ झाली. गतवर्षी दाखल गुन्ह्यांची संख्या १०४ वर गेली आहे. पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनीही वार्षिक आढाव्याची माहिती देताना सांगितले की, महिलांवर अतिप्रसंग व विनयभंगाच्या ७० टक्के घटनांमध्ये परिचित व्यक्तीच आरोपी असल्याचे निदर्शनास आले असल्याचे स्पष्ट केले. नवी मुंबईमध्ये गत १२ वर्षामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमुळे खळबळ उडाली होती. २००५ मध्ये नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला होता. यानंतर २००७ मध्ये पारसिक हिल टेकडीवर फिनलँड देशातील महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत. २०१३ मध्ये कोपरीमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून खून केल्याच्या घटनेचा राज्यभर निषेध झाला होता. यामधील आरोपीवर जलद न्यायालयात खटला चालवून दीड वर्षात फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व घटनांमुळे नवी मुंबईमध्येही महिला असुरक्षित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उघड्यावरील मद्यपान थांबवावेशहरामध्ये बियर शॉपच्या बाहेर उभे राहून बिनधास्तपणे मद्यपान सुरू असते. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरच मद्यविक्रीचे दुकान आहे. दुकानासमोर उभे राहून मद्यपान सुरू असते. सानपाडा व इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. टपोरी व गुंडप्रवृत्तीचे तरूण मद्यपान करून महिलांची छेडछाड काढत असल्याच्या घटना होत असून उघड्यावरील मद्यपान थांबविण्याची मागणी केली जात आहे.