शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सहा महिन्यांतच ढासळू लागले रेलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:30 IST

कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी उपस्थित केली शंका

नवी मुंबई : रस्त्यांलगत रेलिंग बसवण्याच्या कामात झालेल्या हलगर्जीमुळे ते ढासळू लागले आहेत. अशाच प्रकारातून गुरुवारी घणसोलीत रस्त्यालगतचे पूर्ण रेलिंग ढासळले. सुदैवाने त्यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. मात्र निकृष्ट कामांमुळे रेलिंग पडत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक नोडमधील रस्त्यांलगत रेलिंग बसवण्यात आले आहेत. मात्र ठेकेदारांमार्फत ही कामे केली जात असताना त्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे रेलिंग बसवल्याच्या काही दिवसातच ते वाकल्याचे किंवा त्याखालील भाग खचल्याचे दिसून येत होते. अशाच प्रकारे घणसोली सेक्टर ७ येथे देखील संपूर्ण रेलिंग रस्त्याकडील बाजूला झुकले होते. परंतु लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे डोळेझाक होत होती. परिणामी गुरुवारी रात्री ते रेलिंग रस्त्यावर कोसळले. त्याच ठिकाणी नागरिकांना पदपथावर बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानुसार त्याठिकाणी सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक व लहान मुले बसलेली असतात. त्यामुळे जर हे रेलिंग पदपथावर कोसळले असते, तर जीवितहानीचीही शक्यता निर्माण झाली असती. यामुळे पादचाºयांसह रहदारीला देखील अडथळा निर्माण होत आहे.अशाच प्रकारे शहरातील इतरही अनेक ठिकाणचे रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यानंतरही लोकप्रतिनिधींकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने सहा महिन्यांपूर्वी सर्वच नोडमध्ये केलेल्या रेलिंगच्या कामात लोकप्रतिनिधींचाहीअर्थपूर्ण हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.