शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

६० हजार कोटींच्या कर्जासाठी एमएमआरडीएला एवढी घाई का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 09:17 IST

अनेक प्रकल्पांत भूसंपादनाचे त्रांगडे; पर्यावरणविषयक मंजुऱ्याही लालफितीत

- नारायण जाधव 

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस मंत्रिमंडळाने १६ जुलैच्या बैठकीत मान्यता दिली. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली-ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापही यातील अनेक प्रकल्पांसाठींची भूसंपादन, बाधितांचे  पुनर्वसन, पर्यावरण विषयक मंजुऱ्या मिळालेल्या नाहीत. मग कर्ज घेण्याची इतकी घाई कशासाठी, एकदा कर्ज घेतले की त्याचे हप्ते सुरू होतील, मग ते भरायचे कसे? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण पर्यावरणविषयक मंजुऱ्या आणि भूसंपादन हा वेळखाऊ विषय असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. 

विशेष म्हणजे, मेट्रो, सी-लिंंकसह भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांंच्या कोटी-कोटींच्या विकास प्रकल्पांमुळे एमएमआरडीएला सध्या निधीची प्रचंंड चणचण भासू लागली आहे. यासाठी वर्ल्ड बँकेपासून जपानची जायका, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यापासून एमएमआरडीएला ६० हजार १२४ कोटींची गरज आहे. धक्कादायक म्हणजे ही गरज भागविण्यासाठी एमएमआरडीएच्या संचालक मंडळाने बाजारात अनेक अर्थपुरवठा करणाऱ्या उपलब्ध संंस्था असताना तब्बल १२० कोटी रुपये दलाली देण्याच्या बोलीवर एसबीआय कॅपिटल मार्केट लि. यांची नियुक्ती केली आहे. 

 एसबीआय कॅपिटल मार्केट लि.ची सिंगल सोर्स बेसिसवर हे कर्ज उभारण्यासाठी व्यवहार व प्रकल्प सल्लागार म्हणून विविध अर्थपुरवठादारांकडून हे कर्ज घेण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी त्यांना एकूण कर्जाच्या ०.२० टक्के शुल्क देण्यात येणार आहे. ते १२० कोटी इतके प्रचंंड आहे. शिवाय, जे ६० हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे, त्याचे व्याज एमएमआरडीएला द्यावे लागणार आहे. 

    कोविडकाळापासून महानगर प्रदेशातील मुंबई आणि नवी मुंबई आणि काही प्रमाणात पनवेल महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मग महापालिकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजापासून एकूण ७७ हजार ४३ कोटींचे अपेक्षित उत्पन्न मिळेलच,  याचीही खात्री देता येत नाही. मग कर्ज घेण्याची घाई कशासाठी, असा सवाल करण्यात येत आहे.

एमएमआरडीएने सध्या १ लाख ७४ हजार ९४० कोटींची कामे हाती घेतली आहेत. यापैकी २०२०-२१ मध्ये ३२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. 

सध्या प्राधिकरणाकडे ४९ हजार कोटींची जमीन व मुंबई महानगर प्रदेशातील विविध महापालिकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजापासून एकूण ७७ हजार ४३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, सी-लिंंक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्ग, उर्वरित मेट्रो प्रकल्पांसाठी ६० हजार १२४ कोटी अर्थात ६० हजार कोटींची गरज  आहे.

मेट्रो आणि शिवडी-न्हाव-शेवा सी-लिंकसाठी ४२ हजार ६४७ कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. येत्या पाच वर्षांत आणखी एक लाख ५ हजार ४३४ कोटींची गरज आहे. 

 यातील सी-लिंक सोडला तर उर्वरित सर्व प्रकल्पांचे भूसंपादन, पर्यावरणविषयक मंजुरी, वृक्ष, खारफुटींची कत्तल करावी लागणार आहे. त्यात बराच वेळ जाणार आहे. 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए