शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार कोटींच्या कर्जासाठी एमएमआरडीएला एवढी घाई का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 09:17 IST

अनेक प्रकल्पांत भूसंपादनाचे त्रांगडे; पर्यावरणविषयक मंजुऱ्याही लालफितीत

- नारायण जाधव 

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस मंत्रिमंडळाने १६ जुलैच्या बैठकीत मान्यता दिली. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली-ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्यापही यातील अनेक प्रकल्पांसाठींची भूसंपादन, बाधितांचे  पुनर्वसन, पर्यावरण विषयक मंजुऱ्या मिळालेल्या नाहीत. मग कर्ज घेण्याची इतकी घाई कशासाठी, एकदा कर्ज घेतले की त्याचे हप्ते सुरू होतील, मग ते भरायचे कसे? हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण पर्यावरणविषयक मंजुऱ्या आणि भूसंपादन हा वेळखाऊ विषय असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. 

विशेष म्हणजे, मेट्रो, सी-लिंंकसह भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांंच्या कोटी-कोटींच्या विकास प्रकल्पांमुळे एमएमआरडीएला सध्या निधीची प्रचंंड चणचण भासू लागली आहे. यासाठी वर्ल्ड बँकेपासून जपानची जायका, एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यापासून एमएमआरडीएला ६० हजार १२४ कोटींची गरज आहे. धक्कादायक म्हणजे ही गरज भागविण्यासाठी एमएमआरडीएच्या संचालक मंडळाने बाजारात अनेक अर्थपुरवठा करणाऱ्या उपलब्ध संंस्था असताना तब्बल १२० कोटी रुपये दलाली देण्याच्या बोलीवर एसबीआय कॅपिटल मार्केट लि. यांची नियुक्ती केली आहे. 

 एसबीआय कॅपिटल मार्केट लि.ची सिंगल सोर्स बेसिसवर हे कर्ज उभारण्यासाठी व्यवहार व प्रकल्प सल्लागार म्हणून विविध अर्थपुरवठादारांकडून हे कर्ज घेण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी त्यांना एकूण कर्जाच्या ०.२० टक्के शुल्क देण्यात येणार आहे. ते १२० कोटी इतके प्रचंंड आहे. शिवाय, जे ६० हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे, त्याचे व्याज एमएमआरडीएला द्यावे लागणार आहे. 

    कोविडकाळापासून महानगर प्रदेशातील मुंबई आणि नवी मुंबई आणि काही प्रमाणात पनवेल महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मग महापालिकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजापासून एकूण ७७ हजार ४३ कोटींचे अपेक्षित उत्पन्न मिळेलच,  याचीही खात्री देता येत नाही. मग कर्ज घेण्याची घाई कशासाठी, असा सवाल करण्यात येत आहे.

एमएमआरडीएने सध्या १ लाख ७४ हजार ९४० कोटींची कामे हाती घेतली आहेत. यापैकी २०२०-२१ मध्ये ३२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. 

सध्या प्राधिकरणाकडे ४९ हजार कोटींची जमीन व मुंबई महानगर प्रदेशातील विविध महापालिकांना दिलेल्या कर्जाच्या व्याजापासून एकूण ७७ हजार ४३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, सी-लिंंक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्ग, उर्वरित मेट्रो प्रकल्पांसाठी ६० हजार १२४ कोटी अर्थात ६० हजार कोटींची गरज  आहे.

मेट्रो आणि शिवडी-न्हाव-शेवा सी-लिंकसाठी ४२ हजार ६४७ कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. येत्या पाच वर्षांत आणखी एक लाख ५ हजार ४३४ कोटींची गरज आहे. 

 यातील सी-लिंक सोडला तर उर्वरित सर्व प्रकल्पांचे भूसंपादन, पर्यावरणविषयक मंजुरी, वृक्ष, खारफुटींची कत्तल करावी लागणार आहे. त्यात बराच वेळ जाणार आहे. 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए