शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

बविआकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

By admin | Updated: October 3, 2014 23:07 IST

वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही.

विशेष प्रतिनिधी
वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर नव्याने साकार झालेल्या पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात प्रबळ लढत देऊ पाहणा:या बहुजन विकास आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे मतदार आणि राजकीय पक्ष यांचे लक्ष वेधले गेले आहे.
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे चिरंजीव विनय कोरे यांनी जनसुराज्य नावाचा पक्ष स्थापन केला परंतु त्यांचा स्वत:चा आमदारकीचा विजय सोडला तर त्या पक्षाचा कोणताही ठसा त्याला उमटवता आला नाही. अशीच अवस्था राज्य पक्ष मग विभागीय पक्ष मग जिल्हास्तरीय पक्ष अशी घसरण झालेल्या शेकापचीही झाली. कालांतराने तो रायगड जिल्ह्यापुरता मर्यादीत झाला परंतु. त्यातही पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सेंधमारी केली. त्यामुळे जिल्हापातळीवरील प्रभावी पक्ष ही संकल्पनाच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोडीत निघाली ती आता बविआच्या रुपाने साकार होऊ पाहते आहे. जर ती यशस्वी झाली तर अशा पक्षांचे महाराष्ट्रात पेव फुटू शकते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने नालासोपारातून व बोईसरमधून विजय मिळविला होता. वसईत त्यांचा निसटता पराभव झाला. परंतु आता स्वत: बविआचे सूत्रधार वसईतून त्यांचे पुत्र नालासोपा:यातून आघाडीचे मावळते आमदार विलास तरे बोईसरमधून तर अन्य तीन मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने तर वसई, नालासोपारा आणि अन्य एका मतदारसंघात बविआ विरोधात उमेदवारच दिलेले नाहीत. अशा स्थितीत या विधानसभा निवडणुकीत बविआची कामगिरी कशी होते? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. तसेच सेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्याच पक्षांचे नेते निकालानंतर ती आपल्याकडे वळावी यासाठी आतापासूनच प्रय}शील आहेत.
 
4प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार द्यायचा प्रसंगी तो आपल्याकडे नसेल तर अन्य पक्षातून फोडून आपल्या पक्षात आणायचा आणि द्यायचा अशी हाराफेरी करणा:या राष्ट्रवादीने नालासोपारा, वसई आणि पालघर या मतदारसंघात उमेदवारच दिलेला नाही कारण जर बविआला भरघोस मिळाले तर तिचे आमदार आपल्याकडे वळावेत, असा राष्ट्रवादीचा हेतू आहे.
 
4आजर्पयत बविआची साथसंगत काँग्रेससोबतच राहिली आहे. अशा स्थितीत पालघरमधील सहाही मतदारसंघात उमेदवार उभे केले असले तरी मागील पाश्र्वभूमी लक्षात घेता यावेळीही तिला आपण आपल्याकडे वळवू शकू असा विश्वास काँग्रेसला आहे.
 
4शिवसेनेने मात्र बविआपासून फटकून राहण्याचा पवित्र घेतला असला तरी भाजपा मात्र गरज लागलीच तर बविआचे सहकार्य घेण्याच्या मूडमध्ये आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते बविआच्या सूत्रधारांच्या संपर्कात असले तरी प्रत्यक्षात पक्षीय बलाबल सिद्ध झाल्यानंतरच बविआ कुठे हे कळू शकेल.