शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

बविआकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

By admin | Updated: October 3, 2014 23:07 IST

वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही.

विशेष प्रतिनिधी
वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर नव्याने साकार झालेल्या पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात प्रबळ लढत देऊ पाहणा:या बहुजन विकास आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे मतदार आणि राजकीय पक्ष यांचे लक्ष वेधले गेले आहे.
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे चिरंजीव विनय कोरे यांनी जनसुराज्य नावाचा पक्ष स्थापन केला परंतु त्यांचा स्वत:चा आमदारकीचा विजय सोडला तर त्या पक्षाचा कोणताही ठसा त्याला उमटवता आला नाही. अशीच अवस्था राज्य पक्ष मग विभागीय पक्ष मग जिल्हास्तरीय पक्ष अशी घसरण झालेल्या शेकापचीही झाली. कालांतराने तो रायगड जिल्ह्यापुरता मर्यादीत झाला परंतु. त्यातही पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सेंधमारी केली. त्यामुळे जिल्हापातळीवरील प्रभावी पक्ष ही संकल्पनाच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोडीत निघाली ती आता बविआच्या रुपाने साकार होऊ पाहते आहे. जर ती यशस्वी झाली तर अशा पक्षांचे महाराष्ट्रात पेव फुटू शकते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने नालासोपारातून व बोईसरमधून विजय मिळविला होता. वसईत त्यांचा निसटता पराभव झाला. परंतु आता स्वत: बविआचे सूत्रधार वसईतून त्यांचे पुत्र नालासोपा:यातून आघाडीचे मावळते आमदार विलास तरे बोईसरमधून तर अन्य तीन मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने तर वसई, नालासोपारा आणि अन्य एका मतदारसंघात बविआ विरोधात उमेदवारच दिलेले नाहीत. अशा स्थितीत या विधानसभा निवडणुकीत बविआची कामगिरी कशी होते? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. तसेच सेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्याच पक्षांचे नेते निकालानंतर ती आपल्याकडे वळावी यासाठी आतापासूनच प्रय}शील आहेत.
 
4प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार द्यायचा प्रसंगी तो आपल्याकडे नसेल तर अन्य पक्षातून फोडून आपल्या पक्षात आणायचा आणि द्यायचा अशी हाराफेरी करणा:या राष्ट्रवादीने नालासोपारा, वसई आणि पालघर या मतदारसंघात उमेदवारच दिलेला नाही कारण जर बविआला भरघोस मिळाले तर तिचे आमदार आपल्याकडे वळावेत, असा राष्ट्रवादीचा हेतू आहे.
 
4आजर्पयत बविआची साथसंगत काँग्रेससोबतच राहिली आहे. अशा स्थितीत पालघरमधील सहाही मतदारसंघात उमेदवार उभे केले असले तरी मागील पाश्र्वभूमी लक्षात घेता यावेळीही तिला आपण आपल्याकडे वळवू शकू असा विश्वास काँग्रेसला आहे.
 
4शिवसेनेने मात्र बविआपासून फटकून राहण्याचा पवित्र घेतला असला तरी भाजपा मात्र गरज लागलीच तर बविआचे सहकार्य घेण्याच्या मूडमध्ये आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते बविआच्या सूत्रधारांच्या संपर्कात असले तरी प्रत्यक्षात पक्षीय बलाबल सिद्ध झाल्यानंतरच बविआ कुठे हे कळू शकेल.