शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

पनवेलमधील बेवारस वाहनांचा मालक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 02:47 IST

पालिकेची कारवाई थंडावली : वाहतुकीला होतो मोठा अडथळा

वैभव गायकरपनवेल : शहरात मागील वर्षभरापासून कोरोनामुळे बेवारस वाहनांवर पालिकेची कारवाईत थंडावली आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनांमुळे शहर विद्रुप होत चालले आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांकडून या  वाहनांची तक्रार वाहतूक पोलिसांकडे केली जाते. मात्र, वाहतूक पोलीस संबंधित जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगतात. कोरोनापूर्वी पालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे बेवारस वाहनांवर कारवाईची मोहीम अतिशय वेगवान केली होती. २४ तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर थांबलेल्या वाहनांना पालिकेमार्फत नोटीस दिली जात होती. तरीही वाहने न हटविल्यास पालिकेकडून संबंधितांना दंड आकारला जात होता. मात्र, पुन्हा एकदा बेवारस वाहनांचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कोरोनापूर्वी पालिकेने १९७ वाहने जप्त केली होती. यामध्ये ९९ दुचाकी, १४ तीनचाकी व ८४ चारचाकी वाहनांचा समावेश आहे. कोरोनामुळे पालिकेची बेवारस वाहनांविरोधात कारवाईची मोहीम थंडावली आहे. 

अशा वाहनांमुळे अस्वच्छता बहुतांश चौकात अशा प्रकारची बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच. त्याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. तसेच या गाड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. 

पालिकेकडून मध्यंतरी बेवारस वाहनांवर स्टिकर लावून कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, पुढे त्या वाहनांवर कोणतीच कारवाई झाली नाही. कारवाई केली जात नसल्याने सर्वत्र रस्त्याच्या कडेला बेवारस वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली आहे.- बिना गोगरी,रहिवासी, खारघर सेक्टर १९

कोरोना काळात बेवारस वाहनांवर कारवाई थांबली होती. तत्पूर्वी पालिकेमार्फत १९७ विविध प्रकारची बेवारस वाहने जप्त करण्यात आली? आहेत. सोमवारपासून नव्याने बेवारस वाहनांविरोधात कारवाईची मोहीम पालिका क्षेत्रात राबविणार आहोत. - सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका 

अनेक वेळा ही वाहने कोणाची आहेत ? ती मोकळ्या जागेवर कशी आली? याविषयी रहिवाशांना काहीच माहीत नसते.  याबाबत पालिकेने कारवाईची गरज आहे. - मनेश माने, रहिवासी, पनवेल

अनेक महिने ही वाहने एकाच जागेवर असतात. पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, कारवाई केल्यावर त्या वाहनांचे मालक आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना काय उत्तर देणार ? असे उत्तर  पालिकेचे काही कर्मचारी देतात. - रामचंद्र देवरे, रहिवासी, खारघर सेक्टर ८

बेवारस वाहने पालिकेने जप्त करून त्यांच्यावर कारवाईची गरज आहे. बहुतांश वेळेला अनेक गाडी मालक आपली वाहने रस्त्यावर टाकून जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असतो. संबंधित वाहनांना कोण वालीच नसेल तर पालिकेने त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. - आनंद चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर वाहतूक शाखा

 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईcarकार