शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धावत्या एनएमएमटीचे चाक निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:59 IST

कल्याण मार्गावरील दुर्घटना : प्रसंगावधानतेमुळे जीवितहानी टळली

नवी मुंबई : धावत्या एनएमएमटीचे चाक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या वेळी चालकाने प्रसंगावधानता दाखवत बसवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

एनएमएमटी बसच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग सातत्याने घडत आहेत. बस बंद पडणे, आग लागणे, चालकांचा बेशिस्तपणा अशा प्रकारांमुळे परिवहन प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठत आहे. अशातच सोमवारी सकाळी कल्याण मार्गावरील नारायण फाटा येथे एनएमएमटीचा अपघात झाला. कल्याणवरून बेलापूर रेल्वेस्थानकाकडे जाणारी बस (एमएच ४३ एच ५०३८) त्या ठिकाणी आली असता, अचानक बसचे पुढचे एक चाक निखळले. या वेळी बसमध्ये २५ प्रवासी बसले होते. धावत्या बसचे पुढचे चाक निखळल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशा वेळी प्रसंगावधानता दाखवत चालकाने बसवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे बस रस्त्यालगत सुरू असलेल्या कामाच्या साहित्याला धडकली.

चालकाच्या या प्रसंगावधानतेमुळे प्रवाशांवरील संकट टळले. मात्र एनएमएमटीच्या बाबतीत सतत होणाऱ्या अशा अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून परिवहन सदस्य समीर बागवान यांनी एनएमएमटी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर या दुर्घटनेप्रकरणी वाहन तपासनीस व तांत्रिक विभागातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु अपघातानंतर औपचारिकता म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावण्याऐवजी यंत्रणेत सुधार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांसह परिवहन मंत्र्यांकडे एनएमएमटीसंदर्भात तक्रार करणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले.