शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत, इंधननिर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:59 IST

पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणाऱ्या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला.

नवी मुंबई : नवी मुंबईत गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून इंधन व विद्युत निर्मित्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सुमारे दीडशे मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. हा बायोगॅस पालिकेची वाहने आणि एनएमएमटीच्या बसेससाठी वापरला जाणार आहे. तसेच टाकाऊ भाज्यांपासून विद्युत निर्मित्ती तयार करण्याची तयारीही महापालिकेने दर्शविली आहे.पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या नेटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने यासंदर्भात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी अलिकडेच चर्चा केली. हैद्राबाद येथील बोईपल्ली शहराच्या धर्तीवर वाया जाणाऱ्या भाज्यांवर प्रक्रिया करून विद्युत निर्मित्ती करण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे मांडला. त्या चर्चेनुसार बांगर यांनी टाकाऊ भाजीपाल्यापासून विद्युत निर्मित्ती करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबईत दिवसाला साधारण ७०० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. यात एपीएमसीतील फळ आणि भाजी मार्केटमध्ये सर्वाधिक ओला कचरा गोळा होतो. त्याशिवाय शहरातील हॉटेल्समधूनसुध्दा मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो. एकूण निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे वर्गीकरण केल्यास जवळपास दीड मेट्रीक टन ओला कचरा तयार होतो. या ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मित्ती करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार लवकरच शहरात दोन सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या दोन्ही परिमंडलांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बायोगॅस प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.हैद्राबाद येथील बोईपल्ली या शहरात दिवसाला १० टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून ५०० मेगा युनिट विद्युत तर ३० किलो बायोगॅसची निर्मित्ती केली जाते. नवी मुंबईत असा प्रयोग केल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल. शिवाय पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार आहे.- बी. एन. कुमार, संचालक, नेटकनेक्ट फाऊंडेशन

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका