शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मैदानातील कार्यक्रमांमुळे आठवडे बाजार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:15 IST

अपघाताचा धोका; नियोजनाबाबत महापालिका उदासीन

नवी मुंबई : शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने शहरांमध्ये शेतकरी आठवडे बाजार सुरू केले आहेत. महापालिकेकडून आठवडे बाजार भरणारी मैदाने विविध खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येत असल्याने रस्त्यावर आठवडे बाजार भरू लागले आहेत. महापालिकेच्या उदासीन नियोजनामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका बळावला आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट शहरात विक्री करता यावा यासाठी शहरात आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कृषी पणन मंडळाकडून शेतकºयांना शहरात विविध ठिकाणी संपूर्ण आठवडा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. याला अनुसरून नवी मुंबई शहरातदेखील शेतकºयांना विविध ठिकाणी मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकºयांनी आपले गट आणि कंपन्या बनवून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नवी मुंबई शहरात सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शेतकरी आठवडे बाजाराला देण्यात आलेली मैदाने महापालिका खासगी कार्यक्रमासाठी देखील भाड्याने देत आहे. कार्यक्र म संध्याकाळी असताना सकाळी असलेल्या आठवडे बाजाराला मैदानांमध्ये जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे रस्त्यावर आठवडे बाजार सुरू होऊ लागले आहेत.शेतकरी शेतमाल घेऊन आलेली वाहने, व्यवसायासाठी लावण्यात येणारे शेड आणि ग्राहकांची वर्दळ यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महापालिकेचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांच्या आणि आठवडे बाजाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, मैदानावरील कार्यक्रम काळात महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.