शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

मैदानातील कार्यक्रमांमुळे आठवडे बाजार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:15 IST

अपघाताचा धोका; नियोजनाबाबत महापालिका उदासीन

नवी मुंबई : शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासनाने शहरांमध्ये शेतकरी आठवडे बाजार सुरू केले आहेत. महापालिकेकडून आठवडे बाजार भरणारी मैदाने विविध खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येत असल्याने रस्त्यावर आठवडे बाजार भरू लागले आहेत. महापालिकेच्या उदासीन नियोजनामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका बळावला आहे.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने राज्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट शहरात विक्री करता यावा यासाठी शहरात आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कृषी पणन मंडळाकडून शेतकºयांना शहरात विविध ठिकाणी संपूर्ण आठवडा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. याला अनुसरून नवी मुंबई शहरातदेखील शेतकºयांना विविध ठिकाणी मैदाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकºयांनी आपले गट आणि कंपन्या बनवून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. नवी मुंबई शहरात सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शेतकरी आठवडे बाजाराला देण्यात आलेली मैदाने महापालिका खासगी कार्यक्रमासाठी देखील भाड्याने देत आहे. कार्यक्र म संध्याकाळी असताना सकाळी असलेल्या आठवडे बाजाराला मैदानांमध्ये जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे रस्त्यावर आठवडे बाजार सुरू होऊ लागले आहेत.शेतकरी शेतमाल घेऊन आलेली वाहने, व्यवसायासाठी लावण्यात येणारे शेड आणि ग्राहकांची वर्दळ यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महापालिकेचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांच्या आणि आठवडे बाजाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, मैदानावरील कार्यक्रम काळात महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.