शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या बेडीआधी स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 03:10 IST

लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अधीर झालेल्या वधूंनी थोडं थांबा. कारण ज्या सासरी लग्न करून जाणार आहात तेथे शौचालय आहे की नाही याची पहिले शहानिशा करा आणि शौचालय नसेल

आविष्कार देसाई,  अलिबागलग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अधीर झालेल्या वधूंनी थोडं थांबा. कारण ज्या सासरी लग्न करून जाणार आहात तेथे शौचालय आहे की नाही याची पहिले शहानिशा करा आणि शौचालय नसेल, तर आपल्या आत्मसन्मानासाठी आधी ते बांधायला सांगा, त्यानंतरच लग्न करा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे. सध्या सर्वत्रच लग्नसराईची धामधूम सुरु आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रत्येकी सरासरी पंधराशे लग्न सोहळे उरकणार आहेत. त्यामुळे पाणी व स्वच्छता विभागाने स्वच्छतेचा संदेश पोचविण्यासाठी लग्नसराईचा मुहूर्त साधला आहे. स्वच्छ भारत अभियान संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांची मानसिकता अद्याप बदलण्यात पाणी व स्वच्छता विभागाला पुरेसे यश आल्याचे दिसून येत नाही. विविध उपक्रम राबवून शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आता थेट नारीशक्तीला भावनिक साद घातली आहे. यासाठी लग्नसोहळे अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. एप्रिल आणि मे २०१६ याकालावधीमध्ये असणाऱ्या विविध मुहूर्तांवर १५ तालुक्यात प्रत्येकी सुमारे पंधराशेपेक्षा अधिक संख्येने लग्नसोहळे पार पडणार असल्याची माहिती पुरोहित शशिकांत कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मे महिन्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त आहेत. त्यामुळे आताच लग्न उरकून घेण्याची मानसिकता लग्नांच्या संख्येवरुन दिसून येते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शौचालये बांधणे अद्याप बाकी आहे. नागरिकांचे प्रबोधन थोड्या हटके पध्दतीने केले, तर नागरिकांच्या ते कायमचे लक्षात राहते. यासाठी लग्नसराईचा मुहूर्त साधण्यात आला आहे. जेणेकरुन महिला वर्गामध्ये स्वच्छतेचा संदेश जाईल आणि सासरी शौचालय आहे की नाही याची माहिती घेतील. त्याचा सकारात्मक परिणाम मिळू शकेल असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.सासरी मुलीला कोणतीही कमतरता भासू नये म्हणून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी, मोबाइल, भांडी, दागिने अशा विविध महागड्या वस्तू दिल्या जातात. मात्र सासरी शौचालय आहे की नाही याची माहिती घेतली जात नाही. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी माहेर आणि सासरच्या मंडळींनी शौचालय उभारुन देणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार सर्व मदत करणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.