शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

पनवेलमधील जलशिवार कोरडा ठाक

By admin | Updated: April 17, 2017 04:27 IST

महाराष्ट्र सरकारने टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्यात राबविले. काही प्रमाणात हे अभियान यशस्वीही झाले.

मयूर तांबडे , पनवेलमहाराष्ट्र सरकारने टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान राज्यात राबविले. काही प्रमाणात हे अभियान यशस्वीही झाले. मात्र, पनवेल तालुक्यात तब्बल २२ लाख ९४ हजार निधीचा वापर करून बांधलेल्या जलयुक्त शिवारात एप्रिल महिन्यात एक थेंबही पाण्याचा शिल्लक नाही. परिणामी, आजूबाजूच्या आदिवासीवाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवली आहे.अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. याच धर्तीवर पनवेल तालुक्यातील धोदाणी येथे २६ जानेवारी २०१५ रोजी पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते जलशिवार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या मालडुंगे ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेली मालडुंगे, धोदाणी, धामणी, देहरंग, आदी गावे येतात. उन्हाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे, माथेरानच्या डोंगरावरून वाहून येणारे पाणी गाढी नदीतून खाडीला जाऊन मिळते. पाणी जिरत नसल्याने बहुतांशी गावात दुष्काळसदृश स्थिती आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई होणार नाही. कृषी विभागाच्या अखात्यारीत असलेल्या या कामाकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग आदींचे सहकार्य घेण्यात आले. मात्र, जवळपास २३ लाख रु पये खर्च करून बांधलेल्या या जलयुक्त शिवारात पाणीच शिल्लक राहत नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. या नावीन्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. जलयुक्त अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील धोदाणी परिसरात पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याच्या कामाला सुरु वात करण्यात आली होती. मात्र, यातील पाणी नवीन वर्षाच्या सुरु वातीलाच आटल्यामुळे आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वाढते तापमान आणि पाणीटंचाई यामुळे येथील आदिवासी बांधव हैराण झाले असून यावर उपाययोजना करून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आहेत.