शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डोंगररांगांमध्ये पक्ष्यांसाठी पाणपोई

By admin | Updated: April 12, 2017 02:56 IST

वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी बेलापूरमधील

नवी मुंबई : वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी बेलापूरमधील निसर्गप्रेमी भंडारे कुटुंबीयांनी डोंगरामध्ये सहा किलोमीटर परिसरामध्ये ४० ठिकाणी पाणपोई सुरू केल्या आहेत. या पाणपोई पक्ष्यांसाठी जीवनदायी ठरू लागल्या आहेत. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. दिवा ते दिवाळेपर्यंत खाडीकिनारा व दिघा ते बेलापूर दरम्यान डोंगररांगा व जंगल परिसर लाभला आहे, पण तीव्र उकाड्यामुळे जंगलातील पाण्याचे झरे आटले असून, पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने, त्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. पक्ष्यांचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी बेलापूरमधील निसर्गप्रेमी अर्चना भंडारे, पती गजानन त्यांचा मुलगा कौस्तुभ व क्षितिज या चौघांनी डोंगरांमध्ये झाडांच्या फांद्यांवर ४० पाणपोई सुरू केल्या आहेत. पाण्याच्या बॉटल मध्येच कापून त्या झाडाच्या फांद्यांवर पक्ष्यांना पाणी पिता येईल, अशा पद्धतीने बांधल्या जात आहेत. या बॉटलमध्ये प्रत्येक दोन दिवसांनी पाणी भरले जात आहे. डोंगरावर पाणी नसल्याने पायथ्यापासून २० लीटरच्या कॅन भरून त्या सहा किलोमीटर परिघामधील पाणपोर्इंपर्यंत नेल्या जात आहेत. एक महिन्यापासून नियमितपणे पक्ष्यांना पाणी देण्याचे काम सुरू असून, अजून २० ठिकाणी नवीन पाणपोई सुरू केल्या जाणार आहेत. पाणपोई बसविताना त्या परिसराची पाहणी करण्यात आली. पक्ष्यांची वर्दळ कोणत्या परिसरात असते. आंबा व इतर फळझाडे कुठे आहेत, याचा अभ्यास करून आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. या अभियानामध्ये अजूनही नागरिक सहभागी होऊ लागले आहेत. जूनअखेरपर्यंत ऊन्हाची तीव्रता अशीच राहणार आहे. यामुळे प्रत्येक नागरिकांनी त्यांना शक्य त्याप्रमाणे पशू-पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही अर्चना भंडारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी) तीव्र उकाड्यामुळे जंगलातील पक्ष्यांचाही मृत्यू होत आहे. या घटना थांबविण्यासाठी आम्ही बेलापूरच्या डोंगररांगांमध्ये ४० ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली आहे. अजून २० ठिकाणी सुरू केली जाणार आहे. प्रत्येक दोन दिवसांनी प्रत्येक बॉटलमध्ये पाणी भरण्यात येत आहे. - अर्चना गजानन भंडारे, निसर्गप्रेमी, बेलापूर