शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मॉल्ससह हॉटेलमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: March 29, 2016 03:10 IST

शहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. १९९९ मध्ये व्यावसायिक वापरासाठी २५ टक्के पाण्याचा वापर होत होता. १५ वर्षांनंतरही तेवढाच वापर दाखविला जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची शंकाही उपस्थित होत आहे. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला जास्त पाणी मिळत आहे. परंतु जवळपास दहा वर्षे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय लागल्यामुळे आता टंचाई असल्याची ओरड होत आहे. शहरातील सामान्य नागरिक पाण्याची उधळपट्टी करत नाही. महापालिकेने आवाहन करताच होळीला रंग उधळतानाही पाण्याचा वापर केला नाही. शहरात पूर्वी व आताही पाण्याची उधळपट्टी हॉटेल, मॉल्स व श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जात आहे. मॉल्स व हॉटेलमध्ये प्रसाधनगृह, गार्डन व इतर अनावश्यक कारणांसाठीही पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. १०० सदनिका असणाऱ्या इमारतीमध्ये जेवढा पाण्याचा वापर होतो त्यापेक्षा जास्त पाणी एका मॉलमध्ये वापरले जात आहे. मोठ्या हॉटेलमध्येही अशाचप्रकारे पाण्याचा गैरवापर सुरू आहे. वास्तविक या सर्व व्यावसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर केला पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते टॉयलेट, उद्यान व इतर गोष्टींसाठी वापरण्याची आवश्यकता आहे. पालिका प्रशासन शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी काही लिटर पाणी वाया घालवले तरी त्यांना नोटीस देत आहे. कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. परंतु व्यावसायिकांकडून बिनधास्तपणे पाणी चोरी होत असतानाही काहीच कारवाई होत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जात नाही. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणी साठा पुरवायचा असेल तर हॉटेल व मॉल्सच्या पाण्यामध्ये किमान पन्नास टक्के कपात केली पाहिजे. जे पाणी चोरी करत आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाईची मागणी केली जात आहे.कळंबोली ब्रिजखाली तळेकळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एमजेपीच्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कळंबोली ब्रिजखाली मोठा डोह साचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होऊनही एमजेपीकडून उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कळंबोली आणि नवीन पनवेल नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको एमजेपीकडून पाणी विकत घेते. भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमजेपीच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. कित्येक ठिकाणी वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने पाण्याची गळती होते. कळंबोली स्टील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सिडको वसाहतीत पाणी टंचाई सुरू असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. एमजेपीच्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला विलंब होत असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे पाणी बचत करण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होते याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाण्याचे आॅडिट करणे गरजेचेशहरामध्ये हॉटेल, मॉल्समधील पाण्याचे आॅडिट करण्याची गरज आहे. नक्की या ठिकाणी किती पाणी दिले जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होत आहे का, चोरून नळजोडणी घेतली आहे काय याची माहिती घेणे आवश्यक आहे. मोठ्या ग्राहकांची बिले सार्वजनिक करण्यात यावीत. कोण किती पाणी वापरतो याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.