शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
4
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
5
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
6
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
7
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
8
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
9
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
10
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
11
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
12
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
13
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
14
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
15
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
16
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
17
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
18
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
19
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
20
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा

मॉल्ससह हॉटेलमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Updated: March 29, 2016 03:10 IST

शहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे.

- नामदेव मोरे,  नवी मुंबईशहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. १९९९ मध्ये व्यावसायिक वापरासाठी २५ टक्के पाण्याचा वापर होत होता. १५ वर्षांनंतरही तेवढाच वापर दाखविला जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची शंकाही उपस्थित होत आहे. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला जास्त पाणी मिळत आहे. परंतु जवळपास दहा वर्षे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय लागल्यामुळे आता टंचाई असल्याची ओरड होत आहे. शहरातील सामान्य नागरिक पाण्याची उधळपट्टी करत नाही. महापालिकेने आवाहन करताच होळीला रंग उधळतानाही पाण्याचा वापर केला नाही. शहरात पूर्वी व आताही पाण्याची उधळपट्टी हॉटेल, मॉल्स व श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जात आहे. मॉल्स व हॉटेलमध्ये प्रसाधनगृह, गार्डन व इतर अनावश्यक कारणांसाठीही पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. १०० सदनिका असणाऱ्या इमारतीमध्ये जेवढा पाण्याचा वापर होतो त्यापेक्षा जास्त पाणी एका मॉलमध्ये वापरले जात आहे. मोठ्या हॉटेलमध्येही अशाचप्रकारे पाण्याचा गैरवापर सुरू आहे. वास्तविक या सर्व व्यावसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर केला पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते टॉयलेट, उद्यान व इतर गोष्टींसाठी वापरण्याची आवश्यकता आहे. पालिका प्रशासन शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी काही लिटर पाणी वाया घालवले तरी त्यांना नोटीस देत आहे. कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. परंतु व्यावसायिकांकडून बिनधास्तपणे पाणी चोरी होत असतानाही काहीच कारवाई होत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जात नाही. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणी साठा पुरवायचा असेल तर हॉटेल व मॉल्सच्या पाण्यामध्ये किमान पन्नास टक्के कपात केली पाहिजे. जे पाणी चोरी करत आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाईची मागणी केली जात आहे.कळंबोली ब्रिजखाली तळेकळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एमजेपीच्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कळंबोली ब्रिजखाली मोठा डोह साचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होऊनही एमजेपीकडून उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कळंबोली आणि नवीन पनवेल नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको एमजेपीकडून पाणी विकत घेते. भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमजेपीच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. कित्येक ठिकाणी वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने पाण्याची गळती होते. कळंबोली स्टील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सिडको वसाहतीत पाणी टंचाई सुरू असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत आहे. द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. एमजेपीच्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला विलंब होत असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे पाणी बचत करण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होते याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पाण्याचे आॅडिट करणे गरजेचेशहरामध्ये हॉटेल, मॉल्समधील पाण्याचे आॅडिट करण्याची गरज आहे. नक्की या ठिकाणी किती पाणी दिले जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होत आहे का, चोरून नळजोडणी घेतली आहे काय याची माहिती घेणे आवश्यक आहे. मोठ्या ग्राहकांची बिले सार्वजनिक करण्यात यावीत. कोण किती पाणी वापरतो याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.